शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण ही दुर्दैवी बाब

By admin | Updated: August 17, 2014 01:54 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे मला कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण करावे लागले, अशी खंत पालकमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त करीत लवकरच पाऊस पडावा, अशी प्रार्थना ईश्वरास केली.

देवगावफाटा : सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी मोठे प्रकल्प उभारणे आता सोपे नाही. त्यामुळे शासनाने जमीन संपादित न करता राज्यात एकाच वेळी साखळी सिमेंट बंधाऱ्याचे होत असलेले लोकार्पण ही निश्चितच समाधानाची बाब आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे मला कोरड्या बंधाऱ्याचे लोकार्पण करावे लागले, अशी खंत पालकमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त करीत लवकरच पाऊस पडावा, अशी प्रार्थना ईश्वरास केली.जलसंधारण आणि कृषी विभागाच्या वतीने भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या सेलू तालुक्यातील नागठाणा येथे १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. याप्रसंगी आ. रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जि.प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, तहसीलदार छडीदार, राकॉँचे प्रदेश सचिव डॉ. संजय रोडगे, प्रभाकर वाघीकर, प्रतापराव सोळंके, जगन्नाथ जाधव, सोपानराव मोगल, लिंबाजी मोगल, कार्यकारी अभियंता सत्तार खान यांची उपस्थिती होती. धस म्हणाले, नजरी आणेवारीवरून दुष्काळी परिस्थितीसमोर आल्याने शासनाने संपूर्ण मराठवाडा टंचाईग्रस्त जाहीर केला. वीज बिलात ३३ टक्के सवलत, विद्यार्थी फी माफीचा निर्णय झाला असून टंचाईत पाणी, चारा याबाबतचे अधिकार तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. येथे १८ टीएमसी पाणी क्षमतेच्या बंधाऱ्यात पाण्याची साठवण झाल्यानंतर कृषी उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. परंतु शेतकऱ्यांनी मोटारपंपद्वारे पाणी घेण्याचे धाडस करू नये, दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे म्हणत माझ्या मतदार संघात तीन वर्षापासून दुष्काळ आहे. तरीही शेतकरी फळबागा जगवतात, दररोज २५०० लीटर दूध उत्पादन होते. आ. बोर्डीकरांकडे बघत आपल्या मतदारसंघात दुधाळ जनावरांची संख्या किती आहे, असे म्हणत त्यांंनी फिरकी घेतली. आ. बोर्डीकर आपल्याकडे माझं दुर्लक्ष होत आहे, असे नाही. माझ तर सोडा परंतु सेलू-जिंतूर वरच सर्वांचे लक्ष आहे, असे म्हणत कोपरखळी मारली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच चंदू मोगल, तलाठी सी.पी. वाघ, पोलिस पाटील चांदगेव मोगल यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आबासाहेब मोगल यांनी केले. अमिता वैद्य, गिरीजा पाते यांंनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)