शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

अवकाळीने शेतकऱ्यांचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:07 IST

वैजापूर तालुक्यात अडीच हजार हेक्टरला फटका वैजापूर : गेल्या दोन दिवसांत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने २,५७६ हेक्टर क्षेत्रावरील रबी ...

वैजापूर तालुक्यात अडीच हजार हेक्टरला फटका

वैजापूर : गेल्या दोन दिवसांत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने २,५७६ हेक्टर क्षेत्रावरील रबी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील २९ गावांतील रबीच्या बागायती व जिरायती क्षेत्रावर पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

शहर व ग्रामीण भागात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी सोंंगणीला आलेला गहू व मका पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. याशिवाय कांदा, हरभरा व फळ पिकांचेही नुकसान झाले.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश तलाव भरलेले आहेत. या पाण्याचा उपयोग पिण्यासोबतच सिंचनासाठी होत असल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, कांदा व हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यानुसार गुरुवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील १,८०३ हेक्टर बागायती क्षेत्रावरील व ७७३ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधून नुकसानीबाबत कळवावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.