शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अवकाळीने शेतकऱ्यांचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:07 IST

वैजापूर तालुक्यात अडीच हजार हेक्टरला फटका वैजापूर : गेल्या दोन दिवसांत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने २,५७६ हेक्टर क्षेत्रावरील रबी ...

वैजापूर तालुक्यात अडीच हजार हेक्टरला फटका

वैजापूर : गेल्या दोन दिवसांत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने २,५७६ हेक्टर क्षेत्रावरील रबी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील २९ गावांतील रबीच्या बागायती व जिरायती क्षेत्रावर पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

शहर व ग्रामीण भागात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी सोंंगणीला आलेला गहू व मका पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. याशिवाय कांदा, हरभरा व फळ पिकांचेही नुकसान झाले.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश तलाव भरलेले आहेत. या पाण्याचा उपयोग पिण्यासोबतच सिंचनासाठी होत असल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, कांदा व हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यानुसार गुरुवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील १,८०३ हेक्टर बागायती क्षेत्रावरील व ७७३ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधून नुकसानीबाबत कळवावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.