शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विद्यापीठ कर्मचाऱ्यांनाही आता आगाऊ वेतनवाढ

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

औरंगाबाद : शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रमाणे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना

औरंगाबाद : शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रमाणे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याची ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग, तसेच उस्मानाबाद उपकेंद्राला एक परिपत्रक जारी केले आहे. आगाऊ वेतनवाढ ही २०१२, २०१३ आणि २०१४ या तीन वर्षांसाठी प्रस्तावित आहे. त्यासाठी विद्यापीठातील विविध विभाग व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कार्यरत वर्ग-१, २, ३ व ४ कर्मचाऱ्यांपैकी ज्याचे काम अत्युत्कृष्ट आहे, अशा दोन कर्मचाऱ्यांची नावे कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. नावांची शिफारस ही अत्यंत गोपनीय ठेवण्याची सूचनाही कुलसचिव कार्यालयाने केली आहे. कुलसचिवांकडे प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिफारसी एकत्रितपणे उच्च शिक्षण विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ४आगाऊ वेतनवाढीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची आजपर्यंतची सेवा, त्यांच्या वेतनश्रेणीतील वेतन हे कोणत्या टप्प्यावर आहे, एखाद्या कर्मचाऱ्यास १ आॅक्टोबरपूर्वी पदोन्नती मिळाली असेल व त्याचे पदोन्नती मिळण्यापूर्वीचे काम अत्यंत चांगले असेल, अशाच कर्मचाऱ्यांच्या नावांची शिफारस स्वीकारली जाणार आहे. ४संबंधित विभागप्रमुख अथवा प्राचार्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस करताना कर्मचाऱ्याने बजावलेल्या नावीन्यपूर्ण कार्याबद्दल दोन परिच्छेदामध्ये लिहून पाठविणे बंधनकारक आहे.