शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विद्यापीठ प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: May 9, 2014 00:01 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी भाषेविषयी अस्मिता असणार्‍या आणि विद्यापीठाच्या मराठी विभागावर प्रेम करणार्‍या मंडळींनी विभागाच्या या अवस्थेला विद्यापीठ आणि प्राध्यापकांतील विसंवाद जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाच्या २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनीच परीक्षेला हजेरी लावल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे तर सहा वर्षांपूर्वी विभागाने सुरू केलेल्या एकवर्षीय पदविका अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत लोकमतने ३ मे रोजी ‘विद्यापीठातील मराठी विभागाला लागली घरघर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी विभागाच्या या अवस्थेला जबाबदार कोण याविषयी जाणकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सदर प्रतिनिधीने केला. मान्यवरांनी मराठी विभागास विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत म्हणाले की, विद्यापीठ आणि मॅनेजमेंट कौन्सिलने गुणवत्तेचा विचार न करता तालुका आणि जिल्हास्तरावरील विविध कॉलेजला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली. तेथे सक्षम प्राध्यापक, लायब्ररी आहे अथवा नाही याची देखील शहानिशा करण्यात आली नाही. या सेंटरवर प्रवेश घेतला की पदवी मिळते, एवढेच नव्हे तर सेंटरचे अनुदान बंद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी अपप्रवृत्तींकडे कानाडोळा केला जातो आणि विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. शिवाय एम. ए. मराठी झाल्यानंतर नोकरी मिळण्याची हमी नाही, हेसुद्धा विद्यार्थी गळतीस कारणीभूत आहे. प्रा. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, एकतर असंख्य महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता दिली. तेथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये सवलत दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी विद्यापीठाकडे येण्यास उत्सुक नसतात; सत्र पद्धती, मराठी विभागातील प्राध्यापकांचा परस्पर विसंवाद, असूया, विद्यापीठातील शिक्षणाबद्दल पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात असलेले गैरसमजही मराठी विभागाच्या घरघरीस कारणीभूत आहेत. विवेकानंद कॉलेजमधील मराठी विभागप्रमुख डॉ. दिलीप महालिंगे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील दरी आम्ही कमी केली आहे. परिणामी प्राध्यापकांबद्दल त्यांच्या मनात कोणतीही भीती न राहता ते कधीही शिक्षकांशी बिनधास्तपणे संवाद साधून त्यांची समस्या सोडवून घेतात. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता त्यांना शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी विद्यापीठाऐवजी महाविद्यालयास पसंती देतात.