शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

विद्यापीठ प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: May 9, 2014 00:01 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी भाषेविषयी अस्मिता असणार्‍या आणि विद्यापीठाच्या मराठी विभागावर प्रेम करणार्‍या मंडळींनी विभागाच्या या अवस्थेला विद्यापीठ आणि प्राध्यापकांतील विसंवाद जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाच्या २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनीच परीक्षेला हजेरी लावल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे तर सहा वर्षांपूर्वी विभागाने सुरू केलेल्या एकवर्षीय पदविका अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत लोकमतने ३ मे रोजी ‘विद्यापीठातील मराठी विभागाला लागली घरघर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी विभागाच्या या अवस्थेला जबाबदार कोण याविषयी जाणकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सदर प्रतिनिधीने केला. मान्यवरांनी मराठी विभागास विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत म्हणाले की, विद्यापीठ आणि मॅनेजमेंट कौन्सिलने गुणवत्तेचा विचार न करता तालुका आणि जिल्हास्तरावरील विविध कॉलेजला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली. तेथे सक्षम प्राध्यापक, लायब्ररी आहे अथवा नाही याची देखील शहानिशा करण्यात आली नाही. या सेंटरवर प्रवेश घेतला की पदवी मिळते, एवढेच नव्हे तर सेंटरचे अनुदान बंद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी अपप्रवृत्तींकडे कानाडोळा केला जातो आणि विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. शिवाय एम. ए. मराठी झाल्यानंतर नोकरी मिळण्याची हमी नाही, हेसुद्धा विद्यार्थी गळतीस कारणीभूत आहे. प्रा. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, एकतर असंख्य महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता दिली. तेथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये सवलत दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी विद्यापीठाकडे येण्यास उत्सुक नसतात; सत्र पद्धती, मराठी विभागातील प्राध्यापकांचा परस्पर विसंवाद, असूया, विद्यापीठातील शिक्षणाबद्दल पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात असलेले गैरसमजही मराठी विभागाच्या घरघरीस कारणीभूत आहेत. विवेकानंद कॉलेजमधील मराठी विभागप्रमुख डॉ. दिलीप महालिंगे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील दरी आम्ही कमी केली आहे. परिणामी प्राध्यापकांबद्दल त्यांच्या मनात कोणतीही भीती न राहता ते कधीही शिक्षकांशी बिनधास्तपणे संवाद साधून त्यांची समस्या सोडवून घेतात. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता त्यांना शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी विद्यापीठाऐवजी महाविद्यालयास पसंती देतात.