शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

‘पेट’च्या दुसऱ्या पेपरवर अनिश्चिततेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दोन-चार दिवसांत शासन मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील, त्यानुसार ‘पेट’च्या दुसऱ्या पेपरचे नियोजन करण्याचा ...

औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दोन-चार दिवसांत शासन मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील, त्यानुसार ‘पेट’च्या दुसऱ्या पेपरचे नियोजन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी या परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. तथापि, अगोदरच चार वर्षांच्या दीर्घ खंडानंतर यावर्षी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली; मात्र ‘पेट’च्या पहिल्या पेपरमध्ये झालेल्या अनियमिततांच्या तक्रारी झाल्यामुळे विद्यापीठाने दुसरा पेपर केंद्रावर घेण्याचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या पेपरला ‘कोरोना’चा अडसर येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा (पेट) दुसरा पेपर नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी २१ फेब्रुवारी रोजी घेतला जाणार होता. तथापि, संगणकांची उपलब्धता व आसन व्यवस्थेचा अंदाज घेण्यासाठी २१ फेब्रुवार रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. याबाबत शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली; मात्र अलिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे शासन काय निर्णय घेते, त्यानुसार ‘पेट-२’ चे नियोजन करण्याचे या बैठकीत ठरले. या बैठकीत परीक्षेला प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, केंद्रांवर ऑनलाइन परीक्षेबाबत त्यांचा कल आणि चारही जिल्ह्यांत उपलब्ध होणाऱ्या संगणक व आसन व्यवस्थेसंबंधीची माहिती जाणून घेतली.

‘पेट’च्या पहिल्या पेपरमध्ये उत्तिर्ण झालेले ६ हजार ७७५ विद्यार्थी दुसऱ्या पेपरसाठी पात्र झाले आहेत. यापैकी किती विद्यार्थी दुसरा पेपर देण्यासाठी इच्छुक आहेत, त्याचा अंदाज ‘गुगल डॉक्स फॉर्म’द्वारे घेण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यात कोणत्या महाविद्यालयाकडे किती संगणक व आसनव्यवस्था उपलब्ध होऊ शकते, याचा आढावा घेण्यात आल्याचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.

चौकट............

९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ म्हणाले की, या दोन- चार दिवसांत कोरोनासंबंधी शासनाच्या मार्गदर्शक सूचना अपेक्षित आहेत.

त्यानुसार ‘पेट-२’चे नियोजन केले जाईल. ‘गुगल डॉक्स फॉर्म’च्या माध्यमातून केंद्र निवडण्यासंबंधी विद्यार्थ्यांकडून माहिती

मागविण्यात आली होती. जवळपास ९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.