शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

स्मृतिवन करारावरून युतीमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: September 19, 2014 01:15 IST

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर कारगिल स्मृतिवन विकासासाठी जिल्हा सैनिक मंडळासोबत केलेल्या करारावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीमध्ये वादंग उभे राहिले आहे.

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर कारगिल स्मृतिवन विकासासाठी जिल्हा सैनिक मंडळासोबत केलेल्या करारावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीमध्ये वादंग उभे राहिले आहे. शिवसेनेचा उद्यान विकासाला विरोध नसून लपून केलेल्या कराराला विरोध असल्याचे स्पष्ट केले. तर भाजपाने तटस्थ भूमिका घेतली आहे. दरम्यान, आर.बी. हिल्स व परिसरातील नागरिकांनी आयुक्त पी. एम. महाजन यांची भेट घेऊन उद्यानाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे. कारगिल स्मृतिवनाचा करार झाल्याचे कळताच खा.चंद्रकांत खैरे प्रचंड संतापले. त्यांनी पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. स्मृतिवनाचा तो करार कुणालाही विश्वासात न घेता केला आहे. त्यामुळे तो करार थांबविण्यात येईल. वेळप्रसंगी कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महापौर कला ओझा यांनी नगररचना विभाग, नगरसचिव विभागाकडून त्या कराराच्या प्रती मागविल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्या जागेवर राज्य सैनिक मंडळाने नामफलक लावला. टीडीआरचे रहस्य कायम...बबाबाई पवार यांची काही जागा त्या ८ एकरमध्ये आहे. ती जागा वगळून उर्वरित जागा जिल्हा सैनिक बोर्डाकडे भाडेकरारावर दिली. सूत्रांच्या मते टीडीआर किंवा इतर मोबदल्यासाठी संबंधित जागा मालकांनी आयुक्तांची भेट घेतली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे टीडीआर प्रकरणात काही घोळ झाल्याची शक्यता सूत्रांनी फेटाळली. नागरी कृती समितीची मागणीसर्वपक्षीय नागरी कृती समितीने महापौर ओझा, सभापती वाघचौरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, आयुक्त महाजन यांची भेट घेऊन उद्यान विकास प्रकरणात पालिकेने कुणाच्या विरोधाला जुमानू नये, अशी मागणी केली. यावेळी नगरसेवक पंकज भारसाखळे, सेवानिवृत्त एसीपी केंद्रे, जसवंतसिंग राजपूत, जगदीश चव्हाण, गंगाधर शेवाळे आदींची उपस्थिती होती.