शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

उमरग्यात विराट मराठा मोर्चा

By admin | Updated: January 17, 2017 00:17 IST

उमरगा : विविध मागण्यांसाठी सोमवारी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चा काढण्यात आला़

उमरगा : मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला हमीभाव द्यावा आदी विविध न्याय मागण्यांसाठी सोमवारी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चा काढण्यात आला़ या मूक मोर्चात तालुक्यासह सीमावर्ती भागातील, मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विशेषत: यात महिला- मुलींची संख्याही लक्षणीय होती़स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवावा, शासकीय प्रकल्पांसाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा तत्काळ देऊन त्यांना उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात भागीदार करावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मराठा समाजातील मुला-मुलींच्या उच्चशिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीपंपाचा विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा, उमरगा शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठा समाजबांधवांचा महाराष्ट्रात समावेश करावा, उमरगा शहराचे नाव धाराशिव, असे करावे, गुंजोटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशासनाने हटविलेला पुतळा तत्काळ बसवावा आदी मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला़ सोमवारी सकाळपासूनच शहरात समाजबांधव हातात भगवे झेंडे घेवून शहरात दाखल होत होते़ राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडून येणाऱ्या गावातील मोर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी काळा मारुती मंदीर, आदर्श महाविद्यालय या ठिकाणी वाहनतळांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पश्चिमेकडून येणाऱ्या विविध गावातील मोर्चेकऱ्यांसाठी गंधर्व हॉटेल मैदान, दत्त कॉलनी, शिंदे मंगल कार्यालय ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.शहरातील दत्त मंदीर परिसरातून मोर्चास सोमवारी दुपारी १२़१५ वाजता सुमारास प्रारंभ झाला. दत्त मंदिरपासून थेट छत्रपती शिवाजी विद्यालयापर्यंत महिलांची स्वतंत्र रांग होती. मोर्चात उमरगा, लोहारा तालुक्यातील व कर्नाटक सीमावर्ती भागातील सकल मराठा समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या मोर्चात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहभागी झाले होते़ मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांसाठी मुस्लीम समाजबांधवांनी मोर्चाच्या मार्गावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केली होती़ (वार्ताहर)