शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

जिल्हा निर्मितीबाबत उदगीरकरांची निराशा

By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST

उदगीर : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला उदगीरकरांचा नवीन जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाला राज्य शासनाने अखेर बगल दिली़

उदगीर : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला उदगीरकरांचा नवीन जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाला राज्य शासनाने अखेर बगल दिली़ त्यामुळे उदगीरकरांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे़ दरम्यान, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीर जिल्हा निर्मितीसंदर्भात विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडला आहे़ ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती राज्य शासनाने केली आहे़ मराठवाड्यात बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई या नव्या जिल्ह्याची तर लातूर जिल्हयचे विभाजन करून उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे़ पलघर जिल्हयच्या निर्मितीबरोबर राजय शासनाकडून मराठवाड्याला विश्ेषत: उदगीरकरांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, शुक्रवारी मंत्रिमंडळाने केवळ ठाणे जिल्ह्याच्या विभाजनालाच मंजुरी दिल्याने उदगीरकरांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी फेरले गेले आहे़ लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे़ उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी सन २०११ च्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न क्रमांक ६२७९ नुसार अंतारांकित प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी उदगीरला जिल्ह्याचा दर्जा देण्याबाबत शासनाचे नियोजन असल्याचे जाहीर केले होते़ पुन्हा आ़ भालेराव यांनी या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडला आहे़ उदगीरला जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी उदगी येथे उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीची स्थापना करण्यात आली़ या कृती समितीने वेळोवेळी आंदोलने केली़ शिवाय सर्वपक्षीय नेत्यांनी अनेकवेळा उदगीरला जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत़ शिवाय, तत्कालिन आमदार व लोकशाळी आघाडी समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रा़एऩडी़पाटील यांनीही विधीमंडळात ८ फेब्रुवारी १९८९ रोजी प्रश्न उपस्थित करून विधिमंडळात चर्चा केली होती़ सीमा प्रश्नाचा तिढा उदगीर जिल्हा निर्मितीने सुटू शकेल, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व माजी आ़ कै़ बापूसाहेब पाटील एकंबेकर यांनी मांडले होते़ शासन दरबारी त्यांनी यासाठी मोठा पाठपुरावाही केला होता़ उदगीरकरांच्या या मागणीला अजून यश आले नसले तरी शासन दरबारी मात्र या प्रश्नाचे भीजत घोंगडे पडले आहे़(वार्ताहर)