शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

माठातील विषारी पाण्याने आणखी २ महिलांचा मृत्यू

By admin | Updated: May 29, 2014 01:14 IST

बिडकीन : पैठण तालुक्यातील बंगला तांडा येथे शेतात काम करणार्‍या चार मजूर महिलांनी जुन्या माठातील विषारी पाणी प्याल्याने एकीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.

 बिडकीन : पैठण तालुक्यातील बंगला तांडा येथे शेतात काम करणार्‍या चार मजूर महिलांनी जुन्या माठातील विषारी पाणी प्याल्याने एकीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता, तर उपचार सुरू असणार्‍या तीन महिलांपैकी बुधवारी सकाळी दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विषबाधा प्रकरणातील बळींची संख्या तीनवर गेली आहे. दि. २३ मे रोजी नाना भालेकर यांच्या शेतात ही घटना घडली होती. ज्या महिलांनी या माठातील पाणी पिले होते, तो माठ जुना होता, तसेच कीटकनाशक फवारणीसाठी त्या माठाचा वापर झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी सदरील माठ तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविला असून अद्याप अहवाल आलेला नाही. तसेच पोलिसांकडे अजूनतरी कुणी तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. हलगर्जीपणा जिवावर बेतला हलगर्जीपणामुळे तीन महिलांना प्राणास मुकावे लागल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या दिवशी पार्वताबाई दुधा राठोड (६५) यांचा मृत्यू झाला होता. आज (बुधवारी) सकाळी औरंगाबाद येथे उपचार सुरू असणार्‍या तीन महिलांपैकी कमळाबाई दौलत आडे (७०) व कौराबाई देवीदास राठोड (४२, दोन्ही रा. बंगला तांडा) या दोघींचा मृत्यू झाला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कमळाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. तर कौराबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, पाच मुली, सासू, सासरे असा मोठा परिवार आहे. कलाबाई शेषराव राठोड यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावरही औरंगाबादमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.