शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

दोन रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द

By admin | Updated: June 23, 2014 00:26 IST

उस्मानाबाद : विविध कारणांवरून जिल्ह्यातील दोन रेशन दुकानांची अनामत जप्त करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत

उस्मानाबाद : साठा फलक नसणे, मालाची पावती न देणे, जादा दराने धान्य विकणे यासह विविध कारणांवरून जिल्ह्यातील दोन रेशन दुकानांची अनामत जप्त करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात कळंब व वाशी तालुक्यातील प्रत्येकी एका दुकानाचा समावेश आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील खोंदला येथील स्वस्त धान्य दुकानदार आबासाहेब अर्जुन मुळीक यांच्याविरुध्द सुधाकर मुळीक व इतरांनी तक्रार दाखल केली होती. यावरून तहसीलदारांनी केलेल्या चौकशीअंती सदरील दुकानदारांने रास्त भाव दुकानात साठा फलक लावला नाही, काही शिधापत्रिकाधारकांना मालाची पावती दिली नाही तसेच दिलेल्या पावतीवर दिनांक नाही, आदी बाबी उघडकीस आल्याचा अहवाल त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केला. याबाबत आबासाहेब मुळीक यांनी सादर केलेला खुलासाही अमान्य करीत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या दुकानाची संपूर्ण अनामत जप्त करून परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, याच दुकानाची गतवर्षीही अनामत जप्त करून संधी देण्यात आली होती. वाशी तालुक्यातील शेंडी येथील दुकानदार भास्कर बाबूराव वीर यांच्या विरूध्दही बाबाहारी शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. यावरून तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत वीर हे ठरवून दिलेल्या किंमतीत धान्य देण्यास टाळाटाळ करुन निर्धारित किंमतीपेक्षा जादा दराने पैसे घेतात, कार्डधारकास मारहाण केली आहे, आदी बाबी समोर आल्या. तहसीलदारांनी पाठविलेल्या अहवालावरून जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे यांनी वीर यांच्याही दुकानाची अनामत जप्त करीत परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)