शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरावर दोन दिवसांच्या निर्जळीचे संकट?

By admin | Updated: July 15, 2014 01:04 IST

विकास राऊत, औरंगाबाद शहराला केव्हाही निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

विकास राऊत, औरंगाबादशहराला केव्हाही निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपल्याने त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार गळती लागत आहे. जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे सध्या रोज १० एमएलडी (१ कोटी लिटर) पाणी वाया जात आहे. काल १३ रोजी खा. खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सेना- भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा विषय निघाला होता. सिडको- हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. यावरून नगरसेवकांनी अभियंत्यांवर प्रश्नांचा वर्षाव केला. शहरअभियंता एस.डी. पानझडे म्हणाले, जलवाहिन्यांना गळती लागलेली आहे. त्यांची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे. दोन दिवसांचा कालावधी डागडुजी करण्यासाठी लागेल. दोन दिवस पाणीपुरवठा विभागाला बंद ठेवण्यासाठी पदाधिकारी जेव्हा परवानगी देतील. त्यानंतर दोन दिवस डागडुजी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमहापौर संजय जोशी म्हणाले, दोन गळतीसाठी प्रशासनाने परवानगी मागितली आहे. त्यावर अजून विचार केलेला नाही. १ कोटी लिटर पाण्याची रोज नासाडीऔरंगाबाद : जायकवाडी ते शहरापर्यंत ३५ कि़मी.च्या प्रवासात १ कोटी लिटर पाणी गळते आहे. ७४ हजार नागरिकांना हे पाणी १३५ लिटरच्या मापकाप्रमाणे मिळू शकते. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १४०० मि.मी.च्या दोन्ही जलवाहिन्यांची चाळणी झाली आहे. त्यांचे वयोमान संपले आहे. त्यामुळे पालिकेला गळत्यांची डागडुजी करण्यापलीकडे पर्याय नाही. ३१ मार्च २०१३ नंतर मनपाने डागडुजीसाठी मोहीम घेतलेली नाही. परिणामी, नागरिकांच्या तोंडचे पाणी जलवाहिनी मार्गावरील नाल्यांमध्ये वाहून जाते. एकीकडे दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे, तर दुसरीकडे कोट्यवधीचे पाणी वाहून जात आहे. पाच कोटींचे पाणी नाल्यात रोज अंदाजे पाच कोटी रुपयांचे पाणी नाल्यात, ओढ्यात वाहून जात आहे. पालिकेला प्रति १ क्युबिक पाणी शहरात आणण्यासाठी अंदाजे १३ रुपये खर्च येतो़ १ एमएलडी म्हणजे १ हजार क्युबिक होतात़ दररोज अंदाजे १० एमएलडी म्हणजे १० हजार क्युबिक पाणी गळते आहे़ प्रति दिवस १० हजार क्युबिक पाणी वाहून जाते. दररोज १ लाख ३० हजार रुपयांचे पाणी वाया जाते आहे. ‘हर्सूल’चे पाणी दूषित होण्याचा धोकाशहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात सध्या १३ फूट पाणी आहे. तलावाच्या परिसरात विविध धार्मिक विधी करून त्याचे निर्माल्य व कचरा तलावात फेकण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलाव परिसरात मनपाने सुरक्षारक्षक वाढवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षी दुष्काळात तो तलाव पूर्णत: आटला होता. तलावातील २० टक्के गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात तलावामध्ये १९ फूट पाणीसाठा झाला. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे. सध्या तलावात १३ फूट पाणीसाठा आहे. शहरातील जुन्या भागातील १६ वॉर्डांतील नागरिकांना हर्सूल तलावातून शुद्ध पाणीपुरवठा नोव्हेंबर २०१३ साली सुरू झाला.तलावातून दोन दिवसांआड ६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पाणी घेण्याचा ताण थोड्या फार प्रमाणात कमी झाला. यामुळे मनपाची वीज, वेळ, पैसा वाचण्यास मदत झाली. २०१२ ते नोव्हेंबर २०१३ असा दीड ते दोन वर्षे हर्सूल तलावातून पाणीपुरवठा बंद होता.