शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

शहरावर दोन दिवसांच्या निर्जळीचे संकट?

By admin | Updated: July 15, 2014 01:04 IST

विकास राऊत, औरंगाबाद शहराला केव्हाही निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

विकास राऊत, औरंगाबादशहराला केव्हाही निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपल्याने त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार गळती लागत आहे. जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे सध्या रोज १० एमएलडी (१ कोटी लिटर) पाणी वाया जात आहे. काल १३ रोजी खा. खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सेना- भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा विषय निघाला होता. सिडको- हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. यावरून नगरसेवकांनी अभियंत्यांवर प्रश्नांचा वर्षाव केला. शहरअभियंता एस.डी. पानझडे म्हणाले, जलवाहिन्यांना गळती लागलेली आहे. त्यांची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे. दोन दिवसांचा कालावधी डागडुजी करण्यासाठी लागेल. दोन दिवस पाणीपुरवठा विभागाला बंद ठेवण्यासाठी पदाधिकारी जेव्हा परवानगी देतील. त्यानंतर दोन दिवस डागडुजी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमहापौर संजय जोशी म्हणाले, दोन गळतीसाठी प्रशासनाने परवानगी मागितली आहे. त्यावर अजून विचार केलेला नाही. १ कोटी लिटर पाण्याची रोज नासाडीऔरंगाबाद : जायकवाडी ते शहरापर्यंत ३५ कि़मी.च्या प्रवासात १ कोटी लिटर पाणी गळते आहे. ७४ हजार नागरिकांना हे पाणी १३५ लिटरच्या मापकाप्रमाणे मिळू शकते. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १४०० मि.मी.च्या दोन्ही जलवाहिन्यांची चाळणी झाली आहे. त्यांचे वयोमान संपले आहे. त्यामुळे पालिकेला गळत्यांची डागडुजी करण्यापलीकडे पर्याय नाही. ३१ मार्च २०१३ नंतर मनपाने डागडुजीसाठी मोहीम घेतलेली नाही. परिणामी, नागरिकांच्या तोंडचे पाणी जलवाहिनी मार्गावरील नाल्यांमध्ये वाहून जाते. एकीकडे दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे, तर दुसरीकडे कोट्यवधीचे पाणी वाहून जात आहे. पाच कोटींचे पाणी नाल्यात रोज अंदाजे पाच कोटी रुपयांचे पाणी नाल्यात, ओढ्यात वाहून जात आहे. पालिकेला प्रति १ क्युबिक पाणी शहरात आणण्यासाठी अंदाजे १३ रुपये खर्च येतो़ १ एमएलडी म्हणजे १ हजार क्युबिक होतात़ दररोज अंदाजे १० एमएलडी म्हणजे १० हजार क्युबिक पाणी गळते आहे़ प्रति दिवस १० हजार क्युबिक पाणी वाहून जाते. दररोज १ लाख ३० हजार रुपयांचे पाणी वाया जाते आहे. ‘हर्सूल’चे पाणी दूषित होण्याचा धोकाशहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात सध्या १३ फूट पाणी आहे. तलावाच्या परिसरात विविध धार्मिक विधी करून त्याचे निर्माल्य व कचरा तलावात फेकण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलाव परिसरात मनपाने सुरक्षारक्षक वाढवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षी दुष्काळात तो तलाव पूर्णत: आटला होता. तलावातील २० टक्के गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात तलावामध्ये १९ फूट पाणीसाठा झाला. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे. सध्या तलावात १३ फूट पाणीसाठा आहे. शहरातील जुन्या भागातील १६ वॉर्डांतील नागरिकांना हर्सूल तलावातून शुद्ध पाणीपुरवठा नोव्हेंबर २०१३ साली सुरू झाला.तलावातून दोन दिवसांआड ६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पाणी घेण्याचा ताण थोड्या फार प्रमाणात कमी झाला. यामुळे मनपाची वीज, वेळ, पैसा वाचण्यास मदत झाली. २०१२ ते नोव्हेंबर २०१३ असा दीड ते दोन वर्षे हर्सूल तलावातून पाणीपुरवठा बंद होता.