शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

लोकशाहीचा अधिकार उदध्वस्त करणारी प्रवृत्ती बंद करा

By admin | Updated: October 7, 2014 00:15 IST

परभणी: चार-दोन पैशांच्या जोरावर लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त करणारी प्रवृत्ती जिल्ह्यात बळावली आहे.

परभणी: चार-दोन पैशांच्या जोरावर लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त करणारी प्रवृत्ती जिल्ह्यात बळावली आहे. या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून ही प्रवृत्ती बंद करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना केले.परभणी विधानसभा मतदारसंघातील राकाँचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्या प्रचारार्थ परभणी येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खा.गणेशराव दुधगावकर, अ‍ॅड. सुरेश जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आ.रामराव वडकुते, माजी मंत्री फौजिया खान, उमेदवार प्रताप देशमुख, मधुसूदन केंद्रे, भीमराव हत्तीअंबिरे, स्वराजसिंह परिहार, बाळासाहेब जामकर, जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, दादासाहेब टेंगसे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जिल्ह्यातील दिग्गज नेते सुरेश वरपूडकर, रामप्रसाद बोर्डीकर, सीताराम घनदाट यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यास एका आमदारास कोर्ट परवानगी देत नाही. या प्रकारचा विक्रम महाराष्ट्रात कोठेही झालेला नाही. त्यामुळे आमदारांची प्रतिष्ठा कमी झाली आहे. ही अशोभनिय बाब आहे. यामध्ये दुरुस्ती करुन या प्रवृत्ती दूर करा. सहकारी चळवळीला आपण शक्ती दिली. परंतु, सहकारी संस्था, बँका उद्ध्वस्त करण्याचे काम काहींनी केले. यापासून जिल्ह्याला वाचवा, असेही त्यांनी आवाहन केले. बाबासाहेब गोपले, आ. वडकुते, अ‍ॅड. दुधगावकर, अ‍ॅड. जाधव आदींसह उमेदवार देशमुख, भांबळे, दुर्राणी यांनी मनोगत व्यक्त केले. देशमुख यांनी परभणी शहरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार तर जवंजाळ यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)गंगाखेडसारखा मतदारसंघ महाराष्ट्रात नाहीआपल्या राजकीय जीवनात १४ निवडणुका लढविल्या. सर्वच जिंकल्या. परंतु, गंगाखेड सारखा मतदारसंघ पाहिला नाही. या मतदारसंघाची चांगलीच चर्चा राज्यपातळीवर ऐकावयास मिळत आहे. निवडणुकीच्या आधी महिनाभर येऊन काही मंडळी ‘मॅनेजमेंट’ करतात. सर्व व्यवस्था ठिकठाक करतात. गंगाखेडचे मतदारही त्यांना मतदान करतात. आम्ही मात्र विकासाची कामे करतो. तरीही जनतेला आमच्याकडून अपेक्षा असतात. या मतदारसंघात मात्र भलतेच घडते.पैशाच्या जोरावर लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त करणारी ही प्रवृत्ती बंद केली पाहिजे व स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.त्यांनी केंद्रातील सरकारने ‘अच्छे दिन आयेंगे’असे स्वप्न दाखविले. परंतु, या सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली जात नाही. परकीय चलन एका बाजूने जात आहे. दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे. जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले पाहिजेत. नव्या नेतृत्वाची फळी समोर आली पाहिजे. राज्यात राष्ट्रवादीचे सरकार आल्यास एलबीटी, शिक्षण आदी प्रश्न सोडविण्यात येतील, असे ही ते म्हणाले.महापौर प्रताप देशमुख यांनी शहरात केलेल्या विकासकामांचे शरद पवार यांनी कौतुक केले व देशमुख यांचे चांगले काम असल्याने त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी उमेदवार प्रताप देशमुख यांनी एल.बी.टी. किंवा जकात कर असा कुठलाही कर न लावता महापालिकेला शासकीय अनुदान द्यावे, अशी मागणी केली.