शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

समाजसेवकांना फुकटात टँकर

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेच्या एन-५, एन-७ आणि कोटला कॉलनी येथील जलकुंभांवर समाजसेवकांचे हजारो लिटर्सचे सुमारे १०० टँकर रोज फुकटात भरून दिले जातात.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेच्या एन-५, एन-७ आणि कोटला कॉलनी येथील जलकुंभांवर समाजसेवकांचे हजारो लिटर्सचे सुमारे १०० टँकर रोज फुकटात भरून दिले जातात. या टँकरचे कुठेही रेकॉर्ड नाही. ते पाणी कुठे नेऊन देतात, कोणत्या वसाहतींमध्ये ते पाणी दिले जाते याची कुठेही नोंद नसल्यामुळे समाजसेवेच्या नावाखाली पालिकेचे पाणी विकले जात असल्याची शक्यता आहे. समाजसेवकांनी स्वत:च्या खर्चातून टँकर उपलब्ध करून दिलेले आहेत. मोफत जलसेवा म्हणून काही भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठाही होत असल्याचे दिसते. मात्र, त्याची नोंद नसल्याचा फायदा पालिकेतील काही महाभाग घेतात. मनपाने किरायाने लावलेले व स्वमालकीच्या टँकर्सची नोंद ठेवली जाते. मात्र, समाजसेवकांच्या टँकर्सना किती पाणी दिले जाते याची कोणतीही नोंद पालिका ठेवत नाही. किंबहुना ते पाणी कोणत्या भागातील नागरिकांना दिले जाते हेदेखील पाहिले जात नाही. महिनाभरापासून शहरात पाण्यासाठी ओरड होत आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढत आहे. मनपाचा रोज १ लाखाचा खर्च अमुल लॉरी सर्व्हिसेस एजन्सीच्या ५८ टँकरवर रोज १ लाख रुपये पालिका खर्च करीत आहे. एका टँकरसाठी रोज २ हजार रुपये आणि प्रतिकिलोमीटर २६ रुपये ७० पैसे इतकी रक्कम मनपा अदा करीत आहे. शहरात मनपाचे ११ व अमुलचे ५८ टँकर सुरू आहेत. एक टँकर दिवसाकाठी ८ फेऱ्या मारते. ६४ टँकरच्या ५१२ फेऱ्या रोज होण्याचे प्रमाण येते. हे टँकर पालिका कुठे देते, कोणत्या वॉर्डात किती टँकरच्या फेऱ्या होतात, टँकर क्रमांकांची यादी, त्याचे मालक कोण आहेत, टँकरच्या पाणीपुरवठ्याची नोंद कशी होते, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.पाणी कुठे जाते हे तपासावेमोफत जलसेवेच्या नावाखाली टँकर जाते कुठे याची मनपाने नोंद ठेवलीच पाहिजे. शेकडो टँकर्सने पाणी जात असल्यामुळे मनपाच्या इतर पाणीपुरवठ्यावर ताण येतो. समाजसेवा म्हणून कुणी टँकर नेत असले तरी ते कुठे घेऊन जातात. त्या टँकरचे चालक पाणी कुठे विकत तर नाहीत ना हे तपासणे पालिकेचे काम आहे, असे उपमहापौर संजय जोशी म्हणाले. शहर अभियंता म्हणाले...टँकरची दररोज नोंद ठेवली जाते. रोज सुमारे ५०० फेऱ्या होतात. मोफत जलसेवा देणाऱ्यांच्या टँकरची नोंद नाही. ते मोफत भरून दिले जातात, असे शहर अभियंता एस.डी. पानझडे म्हणाले.