शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

समाजसेवकांना फुकटात टँकर

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेच्या एन-५, एन-७ आणि कोटला कॉलनी येथील जलकुंभांवर समाजसेवकांचे हजारो लिटर्सचे सुमारे १०० टँकर रोज फुकटात भरून दिले जातात.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेच्या एन-५, एन-७ आणि कोटला कॉलनी येथील जलकुंभांवर समाजसेवकांचे हजारो लिटर्सचे सुमारे १०० टँकर रोज फुकटात भरून दिले जातात. या टँकरचे कुठेही रेकॉर्ड नाही. ते पाणी कुठे नेऊन देतात, कोणत्या वसाहतींमध्ये ते पाणी दिले जाते याची कुठेही नोंद नसल्यामुळे समाजसेवेच्या नावाखाली पालिकेचे पाणी विकले जात असल्याची शक्यता आहे. समाजसेवकांनी स्वत:च्या खर्चातून टँकर उपलब्ध करून दिलेले आहेत. मोफत जलसेवा म्हणून काही भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठाही होत असल्याचे दिसते. मात्र, त्याची नोंद नसल्याचा फायदा पालिकेतील काही महाभाग घेतात. मनपाने किरायाने लावलेले व स्वमालकीच्या टँकर्सची नोंद ठेवली जाते. मात्र, समाजसेवकांच्या टँकर्सना किती पाणी दिले जाते याची कोणतीही नोंद पालिका ठेवत नाही. किंबहुना ते पाणी कोणत्या भागातील नागरिकांना दिले जाते हेदेखील पाहिले जात नाही. महिनाभरापासून शहरात पाण्यासाठी ओरड होत आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढत आहे. मनपाचा रोज १ लाखाचा खर्च अमुल लॉरी सर्व्हिसेस एजन्सीच्या ५८ टँकरवर रोज १ लाख रुपये पालिका खर्च करीत आहे. एका टँकरसाठी रोज २ हजार रुपये आणि प्रतिकिलोमीटर २६ रुपये ७० पैसे इतकी रक्कम मनपा अदा करीत आहे. शहरात मनपाचे ११ व अमुलचे ५८ टँकर सुरू आहेत. एक टँकर दिवसाकाठी ८ फेऱ्या मारते. ६४ टँकरच्या ५१२ फेऱ्या रोज होण्याचे प्रमाण येते. हे टँकर पालिका कुठे देते, कोणत्या वॉर्डात किती टँकरच्या फेऱ्या होतात, टँकर क्रमांकांची यादी, त्याचे मालक कोण आहेत, टँकरच्या पाणीपुरवठ्याची नोंद कशी होते, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.पाणी कुठे जाते हे तपासावेमोफत जलसेवेच्या नावाखाली टँकर जाते कुठे याची मनपाने नोंद ठेवलीच पाहिजे. शेकडो टँकर्सने पाणी जात असल्यामुळे मनपाच्या इतर पाणीपुरवठ्यावर ताण येतो. समाजसेवा म्हणून कुणी टँकर नेत असले तरी ते कुठे घेऊन जातात. त्या टँकरचे चालक पाणी कुठे विकत तर नाहीत ना हे तपासणे पालिकेचे काम आहे, असे उपमहापौर संजय जोशी म्हणाले. शहर अभियंता म्हणाले...टँकरची दररोज नोंद ठेवली जाते. रोज सुमारे ५०० फेऱ्या होतात. मोफत जलसेवा देणाऱ्यांच्या टँकरची नोंद नाही. ते मोफत भरून दिले जातात, असे शहर अभियंता एस.डी. पानझडे म्हणाले.