शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

तुळजापुरात पाच तास आगीचे तांडव

By admin | Updated: December 19, 2014 00:55 IST

तुळजापूर : शहरातील पंढरपूर गल्लीतील दोन घरांसह दोन दुकानाला गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले़ जवळपास पाच तास

तुळजापूर : शहरातील पंढरपूर गल्लीतील दोन घरांसह दोन दुकानाला गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले़ जवळपास पाच तास सुरू असलेले आगीचे तांडव विझविण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाची मोठी धावपळ उडाली़ घरमालक श्रीकांत नाईक यांच्या दक्षतेमुळे यात जिवित हानी झाली नाही़तुळजापूर शहरातील पंढरपूर गल्लीत राहणारे श्रीकांत नाईक , सुधाकर नाईक यांचे घर आहे़ वरच्या मजल्यावर बंगाली सुवर्ण कारागिर भाड्याने राहतात़ तर एक दुकान ब्युटीपार्लरसाठी भाड्याने दिलेले आहे़ सुधाकर नाईक यांनी संपूर्ण घर भाड्याने दिले आहे़ तर तळमजला व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी दिला आहे़ बुधवारी रात्रीच्या सुमारास नाईक हे कुटुंबासह घरात झोपले होते़ गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यावेळी श्रीकांत नाईक यांनी पत्नी, मुलासह भाडेकरूंना उठवून घराबाहेर काढले़ नाईक यांचे घर जळून खाक झाल्यानंतर ही आग सुधाकर नाईक यांच्या घराला लागली़ नाईक यांनी भाडेकरूंना उठवून घराबाहेर काढले़ या भीषण आगीच्या दूरवरील शहापुरे यांच्या घरालाही लागल्या होत्या़ त्यात त्यांच्या घराच्या खिडक्या, दरवाजाचे नुकसान झाले आहे़ आगीची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले़ नगर पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी आणून पाणी मारण्यात आले़ पहाटे साडेपाच, सहा वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच होते़ उस्मानाबाद येथील अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्णत: अटोक्यात आली़ या आगीत नाईक यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, बेड, ब्युटीपार्लर, कारागिर यांचे साहित्य, मौल्यवान वस्तू, मशनरी, फर्निचर असे जवळपास सव्वा कोटी रूपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नाईक यांनी वर्तविला आहे. (वार्ताहर)४श्रीकांत नाईक यांनी घराला आग लागल्यानंतर घरातील मंडळी व भाडेकरूंना उठवून बाहेर काढले़ तसेच स्वत:च्या घरातील, भाडेकरूच्या घरातील तिन्ही गॅससिलेंडर बाहेर सुरक्षित स्थळी आणून ठेवले़ हे गॅस सिलेंडर आगीच्या कचाट्यात सापडले असते तर मोठी दूर्घटना झाली असती़ ती नाईक यांच्या समस सूचकतेमुळे टळल्याचे दिसून येत आहे़४नाईक यांच्या घराला आग लागल्यानंतर नागरिकांनी या भागातील वीजपुरवठा खंडित करण्याबाबत वीजकंपनीला कल्पना दिली होती़ त्यानुसार या भागातील वीज बंद करण्यात आली़ वीज गेल्यानंतर अंधार पसरला तरी परिसरातील नागरीक, अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांनी अंधारात धावपळ करून साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आणली़