शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

तुळजापुरात पाच तास आगीचे तांडव

By admin | Updated: December 19, 2014 00:55 IST

तुळजापूर : शहरातील पंढरपूर गल्लीतील दोन घरांसह दोन दुकानाला गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले़ जवळपास पाच तास

तुळजापूर : शहरातील पंढरपूर गल्लीतील दोन घरांसह दोन दुकानाला गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले़ जवळपास पाच तास सुरू असलेले आगीचे तांडव विझविण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाची मोठी धावपळ उडाली़ घरमालक श्रीकांत नाईक यांच्या दक्षतेमुळे यात जिवित हानी झाली नाही़तुळजापूर शहरातील पंढरपूर गल्लीत राहणारे श्रीकांत नाईक , सुधाकर नाईक यांचे घर आहे़ वरच्या मजल्यावर बंगाली सुवर्ण कारागिर भाड्याने राहतात़ तर एक दुकान ब्युटीपार्लरसाठी भाड्याने दिलेले आहे़ सुधाकर नाईक यांनी संपूर्ण घर भाड्याने दिले आहे़ तर तळमजला व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी दिला आहे़ बुधवारी रात्रीच्या सुमारास नाईक हे कुटुंबासह घरात झोपले होते़ गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यावेळी श्रीकांत नाईक यांनी पत्नी, मुलासह भाडेकरूंना उठवून घराबाहेर काढले़ नाईक यांचे घर जळून खाक झाल्यानंतर ही आग सुधाकर नाईक यांच्या घराला लागली़ नाईक यांनी भाडेकरूंना उठवून घराबाहेर काढले़ या भीषण आगीच्या दूरवरील शहापुरे यांच्या घरालाही लागल्या होत्या़ त्यात त्यांच्या घराच्या खिडक्या, दरवाजाचे नुकसान झाले आहे़ आगीची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले़ नगर पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी आणून पाणी मारण्यात आले़ पहाटे साडेपाच, सहा वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच होते़ उस्मानाबाद येथील अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्णत: अटोक्यात आली़ या आगीत नाईक यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, बेड, ब्युटीपार्लर, कारागिर यांचे साहित्य, मौल्यवान वस्तू, मशनरी, फर्निचर असे जवळपास सव्वा कोटी रूपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नाईक यांनी वर्तविला आहे. (वार्ताहर)४श्रीकांत नाईक यांनी घराला आग लागल्यानंतर घरातील मंडळी व भाडेकरूंना उठवून बाहेर काढले़ तसेच स्वत:च्या घरातील, भाडेकरूच्या घरातील तिन्ही गॅससिलेंडर बाहेर सुरक्षित स्थळी आणून ठेवले़ हे गॅस सिलेंडर आगीच्या कचाट्यात सापडले असते तर मोठी दूर्घटना झाली असती़ ती नाईक यांच्या समस सूचकतेमुळे टळल्याचे दिसून येत आहे़४नाईक यांच्या घराला आग लागल्यानंतर नागरिकांनी या भागातील वीजपुरवठा खंडित करण्याबाबत वीजकंपनीला कल्पना दिली होती़ त्यानुसार या भागातील वीज बंद करण्यात आली़ वीज गेल्यानंतर अंधार पसरला तरी परिसरातील नागरीक, अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांनी अंधारात धावपळ करून साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आणली़