शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 22, 2014 00:16 IST

वलांडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी गारपीट असे संकट शेतकऱ्यांवर कोसळत आहे़

वलांडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी गारपीट असे संकट शेतकऱ्यांवर कोसळत आहे़ सध्या पावसाने ताण दिल्याने या भागातील शेतकऱ्यांवर तिहेरी पेरणीचे संकट ओढवले आहे़यंदाच्या फेब्रुवारी अखेरीस व मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ या संकटातून सावरत असताना पुन्हा पावसाने उघाड दिल्याने संकट आले आहे़ मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस न झाल्याने वलांडी परिसरातील पेरण्या उशिरा झाल्या़ परंतु, बियाणाची उगवण झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची मूठ नाईलाजास्तव धरली़ मात्र त्यांचीही उगवण झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे़ आता तिबार पेरणी करायची का? केली तर मूग, उडीद या पिकाचा तर हंगाम निघून गेला़ आता सोयाबीन पेरायचे का? पेरायचे तर मग बी-बियाणे कसे घ्यायचे असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत़ गारपिटीच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता तिहेरी पेरणीचे संकट आले आहे़ अशा परिस्थितीत पूर्वीच कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी वलांडीसह परिसरातील हेळंब, धनेगाव, हिसामनगर, जवळगा, कवठाळा, टाकळी, बोंबळी, दवणहिप्परगा या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे़ (वार्ताहर)देवणी तालुक्यातील वलांडी परिसरातील शेतकऱ्यांनी सुरुवातीस अल्प पावसावर पेरणी केली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे दुबार पेरणी केली. पुन्हा निसर्गाने दगा दिला. आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागत आहे.