शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न..!

By admin | Updated: November 30, 2015 23:29 IST

जालना : युवक व युवतींमध्ये वाचन संस्कृती अधिक गतीमान व्हावी, या उद्देशाने संपूर्ण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा घेण्याचा मानस मराठवाडा साहित्य

जालना : युवक व युवतींमध्ये वाचन संस्कृती अधिक गतीमान व्हावी, या उद्देशाने संपूर्ण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा घेण्याचा मानस मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्या डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केला. रंगभूमी नियामक मंडळावर तडेगावकर यांची अलिकडेच निवड झाली. यानिमित्त लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. तडेगावकर म्हणाल्या, बहुजन समाजातील महिलांना पूर्वी शिक्षणाची दारे बंद असायची. मात्र, कालांतराने झालेल्या विविध बदलांमुळे आता महिलांचे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबात शैक्षणिक वातावरण असल्याने शिक्षणासाठी तशी परवड झाली नाही. गावात लहानपणी कीर्तन ऐकायची. त्यातूनच शब्द संग्रह वाढत गेला आणि या शब्दांतूनच अनेक कविता माझ्याकडून रचल्या गेल्या. वाचन, मनन आणि चिंतनामुळे माझ्यातील कवयित्रीचा जन्म झाला. साहित्य क्षेत्रात काम करत असताना उर्मीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात माझा वावर वाढला. उर्मीच्या अनेक कवी संमेलनामध्ये मी कविता सादर केलेल्या आहेत. यामुळे आणखी चांगल्या कविता रचण्यासाठी प्रोत्साहन मिळते. गत वर्षी मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक झाली. साहित्यिकांच्या आग्रहामुळे या निवडणुकीत उतरले आणि निवडूनही आले. साहित्य परिषदेच्या माध्यमातून आता आगामी काळात संपूर्ण मराठवाड्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवायचे आहेत. ज्यामुळे साहित्य परिषद खऱ्या अर्थाने ग्रामीण भागत रुजण्यास मदत होईल. मुख्यत्वे करुन ग्रामीण भागातील युवक व युवतींमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा आणि त्यारुपाने एक चळवळ उभारण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध स्पर्धा घेण्यात येतील. जेणेकरुन मुलांच्या सृजनशीलतेला वाव मिळून त्यातून अनेक लेखक, कवी निर्माण होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आगामी दोन वर्षांच्या काळात मराठवाडा साहित्य परिषदेला संचालक मंडळाच्या सहकार्याने वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्या म्हणाल्या.लहानपासूनच आईने दिलेल्या पाठबळामुळे आजपर्यंत यश मिळवू शकले. आईला शिक्षणाची ओढ होती. त्यामुळे मी खूप शिकावं अशी तिची इच्छा होती. तिच्या या भूमिकेमुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळत गेले. तुकाराम, जनाबाई, कान्होपात्रा या व्यक्तींविषयी मला विशेष आकर्षण होते. पीडित, शोषितांचे लिखाण मनाला अधिक भावते. ८० च्या दशकानंतर कवियत्रींच्या स्त्रीवादी जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात वर्षातून किमान एक जिल्हास्तरीय संमेलन व्हावे, यासाठी प्रयत्न असून, त्यादृष्टिने मराठवाडा साहित्य व सांस्कृतिक मंडळाची वाटचाल सुरू आहे.