शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

सौर कालगणना ग्लोबल होण्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करा

By admin | Updated: June 23, 2014 00:32 IST

औरंगाबाद : भारतीय सौर कालगणना ही संपूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे.

औरंगाबाद : भारतीय सौर कालगणना ही संपूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे. सूर्याला केंद्रबिंदू मानून वर्षातील १२ महिने ३६५ दिवसांची अचूक गणिती मांडणी यात करण्यात आली आहे. पाश्चात्त्य कालगणना या चुकीच्या, विसंगत तत्त्वावर आधारित आहेत. याकरिता भारतीय सौर कालगणनेला जागतिक स्तरावर रुजविण्यासाठी सर्वप्रथम तिचा वापर आपल्या दैनंदिन जीवनापासून करा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले. सौर कालगणना प्रचार-प्रसार मंच, ऊर्जा सहयोगी व स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘सौर कालगणना’ या विषयावर ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या व्यासपीठावर न्या. अंबादास जोशी, केशवराव डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ऊर्जा सहयोग प्रकाशित एस.बी. कुलकर्णी व विष्णू देशपांडेलिखित ‘इन्व्हर्टर’ (अखंड वीजपुरवठा संयंत्र) या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जलतज्ज्ञ चितळे म्हणाले की, सूर्यावर आधारित कालगणनेवरील ग्रंथ चौथ्या शतकात लिहिण्यात आला आहे. त्यावेळी देशात स्वत:च्या प्रयोगशाळा होत्या. जगात सर्वप्रथम कालगणनेची अचूक मांडणी भारतीय ज्योतिषांनी केली. ही कालगणनेची मांडणी ‘पंचांग’ स्वरूपात आजही रूढ आहे. भारतीय जगाचा पाठीवर जेथे गेले आहेत तेथे त्यांनी सौर कालगणनेचा प्रचार-प्रसार केला आहे. देशभरात भारतीय संस्कृतीचे मानदंड आजही उभे आहेत. हेच आधुनिक तीर्थक्षेत्र बनले पाहिजे. पाश्चात्त्य दिनदर्शिका अवैज्ञानिक व विसंगतीने भरलेली आहे. त्याचाच अवलंब आपण आजही करीत आहोत. सौरकालगणना जपान, चीनने स्वीकारली; पण भारतीयांनी अजूनही आपली सौरकालगणना दैनंदिन जीवनात स्वीकारली नाही, ही खंत चितळे यांनी व्यक्त केली. अणुऊर्जेतून ऊर्जानिमित्ती केल्यास त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत न्या. जोशी यांनी ऊर्जा भोगी संस्कृतीकडे न वळता ऊर्जा बचतीकडे वळा, असा संदेश दिला.सौर कालगणना म्हणजे काय सौर कालगणनेत २१ मार्च अर्थात १ चैत्रपासून वर्षाला आरंभ होतो. याच दिवसापासून सौर वर्षाची सुरुवात होते. या दिवशी जगभरात रात्र आणि दिवस समसमान १२ तासांचे असतात. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि दिवस मोठा होत जातो. २३ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. उत्तर गोलार्धात सूर्य अधिक काळ राहतो. यामुळे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे सलग पाच महिने ३१ दिवसांचे, तर उर्वरित ३० दिवसांचे असतात. चैत्र महिना लीप वर्ष असेल तर ३१ चा; अन्यथा ३० दिवसांचा असतो.