शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

यश प्राप्त करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:05 IST

औरंगाबाद : आपले जीवन सार्थक करायचे असेल, तर तुमच्यात ऊर्जा, ताजेपणा यासोबतच सदसद्‌विवेकबुद्धी अर्थात ‘होश’ असला पाहिजे. मी काय ...

औरंगाबाद : आपले जीवन सार्थक करायचे असेल, तर तुमच्यात ऊर्जा, ताजेपणा यासोबतच सदसद्‌विवेकबुद्धी अर्थात ‘होश’ असला पाहिजे. मी काय मिळविले, यापेक्षा आणखी मोठे यश प्राप्त करणार, या जिद्दीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘ऑनलाइन संवाद’ उपक्रमात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शुक्रवारी संवाद साधला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख, डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारत गणेशपुरे यावेळी म्हणाले, मागील दीड वर्षाने आपल्याला खूप काही शिकविले. निसर्ग हा माणसापेक्षा बलशाली असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. माणूस समाजशील प्राणी आहे. मात्र, त्याच्यावर ‘आयसोलेटेड’ राहण्याची वेळ आली. या लाटेत जे स्वत:मध्ये बदल करून घेतील तेच टिकाव धरू शकणार आहेत. कला, संस्कृती व मनोरंजनाचे क्षेत्रही बदलत आहे. ग्रामीण भागात वाडी, तांड्यांवरील मुले आपल्या अभिनयाने नावलौकिक मिळवीत आहेत. जगात अशक्य असे काहीच नसते, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे.

डॉ. जयंत शेवतेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले.

नाट्यशास्त्र विभागाला गतवैभव मिळवून देऊ

विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाने नाट्य, कला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राला देदीप्यमान यश मिळवून दिले आहे. या विभागाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले.

कलावंतांनाही खासगी जीवन असते

कोणत्याही क्षेत्रात सेलेब्रिटी झालेल्याच्या घरात नको तेवढे डोकावण्याची वृत्ती वाढली आहे. कलावंताच्या पाठीमागेदेखील चुकीच्या पद्धतीने चर्चा होतात. कलावंतालादेखील खासगी जीवन असते, ते त्याला जगू दिले पाहिजे, असेही भारत गणेशपुरे म्हणाले.