शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

यश प्राप्त करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:05 IST

औरंगाबाद : आपले जीवन सार्थक करायचे असेल, तर तुमच्यात ऊर्जा, ताजेपणा यासोबतच सदसद्‌विवेकबुद्धी अर्थात ‘होश’ असला पाहिजे. मी काय ...

औरंगाबाद : आपले जीवन सार्थक करायचे असेल, तर तुमच्यात ऊर्जा, ताजेपणा यासोबतच सदसद्‌विवेकबुद्धी अर्थात ‘होश’ असला पाहिजे. मी काय मिळविले, यापेक्षा आणखी मोठे यश प्राप्त करणार, या जिद्दीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘ऑनलाइन संवाद’ उपक्रमात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शुक्रवारी संवाद साधला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख, डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारत गणेशपुरे यावेळी म्हणाले, मागील दीड वर्षाने आपल्याला खूप काही शिकविले. निसर्ग हा माणसापेक्षा बलशाली असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. माणूस समाजशील प्राणी आहे. मात्र, त्याच्यावर ‘आयसोलेटेड’ राहण्याची वेळ आली. या लाटेत जे स्वत:मध्ये बदल करून घेतील तेच टिकाव धरू शकणार आहेत. कला, संस्कृती व मनोरंजनाचे क्षेत्रही बदलत आहे. ग्रामीण भागात वाडी, तांड्यांवरील मुले आपल्या अभिनयाने नावलौकिक मिळवीत आहेत. जगात अशक्य असे काहीच नसते, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे.

डॉ. जयंत शेवतेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले.

नाट्यशास्त्र विभागाला गतवैभव मिळवून देऊ

विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाने नाट्य, कला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राला देदीप्यमान यश मिळवून दिले आहे. या विभागाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले.

कलावंतांनाही खासगी जीवन असते

कोणत्याही क्षेत्रात सेलेब्रिटी झालेल्याच्या घरात नको तेवढे डोकावण्याची वृत्ती वाढली आहे. कलावंताच्या पाठीमागेदेखील चुकीच्या पद्धतीने चर्चा होतात. कलावंतालादेखील खासगी जीवन असते, ते त्याला जगू दिले पाहिजे, असेही भारत गणेशपुरे म्हणाले.