शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

आवाडांनी केला पारधी पेढीचा कायापालट

By admin | Updated: May 26, 2015 00:47 IST

बालाजी बिराजदार , लोहारा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा झुंजार नेता आज आमच्यात नाही हे मनाला पटत नाही. वंचितांच्या हक्कासाठी परिणामांची पर्वा न करता लढायचे बळ ‘जिजा’नेच आम्हाला दिले

बालाजी बिराजदार , लोहारासर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा झुंजार नेता आज आमच्यात नाही हे मनाला पटत नाही. वंचितांच्या हक्कासाठी परिणामांची पर्वा न करता लढायचे बळ ‘जिजा’नेच आम्हाला दिले. एकनाथ आवाड आमच्यासाठी खऱ्या अर्थाने मायबाप होते. अशी प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानचे राजकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. १९९३ साली एकनाथ आवाड यांनी मानवी हक्क अभियान या संघटनेची स्थापना केली. तेंव्हापासून मी आवाडांसोबत काम करीत आहे. चळवळीतील अनेक कार्यकर्ते या नेत्याला ‘जिजा’ या नावानेच संबोधत असत. त्यांच्यासोबतच विवेक पंडित, दत्ता खंडागळे, कैलास पवार, मोहन ताटे, बजरंग ताटे असे आम्ही सर्वजण कार्यरत होतो. १९९३ साली लोहारा-उमरगा तालुक्यात भूकंप झाला. ही बातमी समजल्यानंतर एकनाथ आवाड उस्मानाबादेत धावून आले. भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित केले. या कामासाठीच भूकंपग्रस्त भागातील पेठसांगवी येथे अभियानाचे कार्यालय सुरु करण्यात आले. प्रत्येक कामात एकनाथ आवाड आमच्यासोबत असायचे. आमच्याबरोबरच जेवण करायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हायचे. या हक्काच्या कार्यकर्त्यांना सोबतच घेवूनच त्यांनी वंचितासाठी अनेक लढे लढले. विशेषत: भूमीहिनांना गायरान जमिनी द्याव्यात, यासाठी त्यांनी मराठवाड्यात मोठे काम केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागातील भूमीहिनांना त्यांच्यामुळेच हक्काच्या जमिनी मिळाल्या. गरीब, कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलनाला पर्याय नाही. आंदोलनाचा मार्ग बाबासाहेबांनी आम्हाला दिलाय. त्याचा योग्य वापर करा, असे ते म्हणायचे. आंबेडकरांनी कायद्यात वंचित कष्टकऱ्यांसाठी काय तरतुदी केल्यात ते सांगायचे. यातूनच माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते घडले, असे राजकुमार गायकवाड यांनी सांगितले.फुलवाडी येथे माझे दलित कुटुंबाचे एकच घर. २००२ साली गावातील काहीजणांशी वाद-विवाद झाला. याप्रकरणी मी पोलिसात तक्रार दिली. मात्र तरीही प्रकरण मिटेना. म्हणून माजलगावला जावून घडलेली घटना एकनाथ आवाड यांना सांगितली. त्यानंतर आवाड स्वत: फुलवाडीत आले. सर्वांसमक्ष माझ्या खांद्यावर हात ठेवला. आमचा कार्यकर्ता कोणावर अन्याय करणार नाही. मात्र कोणाचा अन्यायही आम्ही सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते, अशी आठवणही गायकवाड यांनी सांगितली.