शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी दुपारी ४ वाजेनंतर केली दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने नागरिक सुखावले. शहराचे ठप्प झालेले ...

औरंगाबाद : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने नागरिक सुखावले. शहराचे ठप्प झालेले अर्थचक्र सुरू झाल्याने व्यापार्‍यांतही उत्साह दिसून आला. वेळेच्या बाबतीत काही व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्यामुळे त्यांनी दुपारी चार वाजता तर काहींनी सात वाजता दुकाने बंद केली. प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.

अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील अर्थकारण पुन्हा ठप्प झाले होते. मात्र राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनलॉक करताना औरंगाबाद शहराचा समावेश श्रेणी-१ मध्ये केला. त्यामुळे तब्बल ८७ दिवसांनी सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच शहर पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले. शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने, पर्यटनस्थळे सर्व काही खुले झाले. व्यापारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजारपेठा सुरू होताच पहिल्याच दिवशी सकाळपासून खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. दुकाने, विविध प्रकारचे व्यवसाय सुरू झाल्याने व्यापारी वर्गदेखील सुखावलेला दिसून आला. शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, सराफा बाजार, सिटी चौक परिसर, टीव्ही सेंटर, शहानूरमिया दर्गा, मुकुंदवाडी मार्केट, उस्मानपुरा, छावणी, रेल्वेस्टेशन या भागातील बाजारपेठ ग्राहकांनी फुललेली दिसून आली. जुन्या मोंढ्यात विविध प्रकारच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. काही व्यापारी संभ्रमात असून, त्यांनी दुपारी चार आणि सायंकाळी सात वाजता दुकाने बंद केली.

नागरिकांकडून कोराेनाच्या नियमांचे पालन नाही

शहरातील प्रमुख बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र बाजारपेठेत वावरणार्‍यांपैकी काही नागरिक बेपर्वाई करत विनामास्क दिसून आले. कोरोनाच्या नियमांचे पालन नागरिकांकडून होताना दिसून येत नाही.