शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

By admin | Updated: October 1, 2014 00:40 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्र परत घेण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजता संपत आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्र परत घेण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजता संपत आहे. मुदतीआधीच बंडखोरांना बसविण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीसाठी नऊही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले असले तरी अखेरच्या मुदतीनंतर रिंगणात कोण राहते आणि कोण माघार घेते हे उद्याच स्पष्ट होणार आहे. विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी २७ सप्टेबरपर्यंत इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत ३१९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यापैकी ३६ जणांचे अर्ज बाद ठरले. त्यामुळे आता २८३ जणांचे अर्ज उरले आहेत. एकेका मतदारसंघात कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ५० उमेदवार उरले आहेत.उमेदवारांच्या या गर्दीमुळे मत विभाजनाचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रमुख उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे उद्या अनेक जण माघार घेण्याची शक्यता आहे. परिणामी उद्या बुधवारी दुपारी ३ वाजेनंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. चिन्ह वाटपमाघार घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने नुकतीच चिन्हांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार प्रमुख राजकीय पक्षांसाठी ८ चिन्ह राखीव ठेवण्यात आले आहेत. तर अपक्षांसाठी ८५ मुक्त चिन्हांचा पर्याय उपलब्ध असणार आहे.