शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशाची एकजूटता दाखवून देण्याची वेळ !

By admin | Updated: September 24, 2016 00:19 IST

देशासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या या जवानांना लोकमत समूह आणि प्रोझोनतर्फे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोझोन मॉल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : काश्मीरमधील उरी येथील लष्करी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. देशासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या या जवानांना लोकमत समूह आणि प्रोझोनतर्फे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोझोन मॉल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होऊन जवानांप्रती श्रद्धा व्यक्त करून देशाची एकजूटता दाखवून देण्याची ही वेळ असल्याची भावना स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिकांमधून व्यक्त करण्यात आली. देशवासीयांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हीच भावना समोर ठेवून जवानांप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी यावेळी शेकडो दीप, मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातील. यामध्ये प्रत्येक स्वाभिमानी भारतीयांना सहभागी होऊन शहिदांना अभिवादन करून देशाप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त करता येतील. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ, विविध संस्था, संघटना यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.भावना व्यक्त करादेशाच्या सीमेवरील ही घटना अनपेक्षित आहे, असे वाटत नाही. परंतु आज सीमेचे संरक्षण करण्याबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी लष्कर लागत आहे. त्या तुलनेत आवश्यक शस्त्र सामुग्री दिली जात नाही. डिफेन्सचे बजेट तुटपुंजे आहे. ते वाढले पाहिजे, जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक जण भावना व्यक्त करीत आहे; परंतु संयम ठेवून या भावना व्यक्त केल्या पाहिजे. सर्वसामान्यांनी एका आवाजात बोलले पाहिजे. -कर्नल (नि.)समीर राऊतशहिदांना मानवंदना नागरिकांनी एकजूट होऊन उभे राहिले पाहिजे. या घटनेनंतर भारतीय लष्कर उत्तर द्यायला समर्थ आहे. देशाच्या सीमेवर लढणारे जवान सदैव आपल्या हृदयात राहिले पाहिजे. सीमेवर लढताना केवळ कुटुंबियांच्या देखभालीचे वचन ते देशवासीयांकडून मागत असतात. त्यासाठीही नागरिकांनी पुढे आले पाहिजे. केवळ १५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी देशाप्रती भावना व्यक्त करता कामा नये. शहिदांना मानवंदना देऊन त्यांचा कायम आदर केला पाहिजे.-जसवंतसिंग, अध्यक्ष, मातृभूमी संस्थाराष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवादहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमधील देशभक्तीच्या भावना समोर येत आहेत. इतर संस्कारांप्रमाणे मुलांमध्ये राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजविला पाहिजे. सीमेवर असलेल्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे.-राजेश भोसले पाटील, संस्थापक, डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेजलोकांनी पुढे यावेदहशतवादी हल्ल्याच्या घटना वारंवार होत आहेत. एकप्रकारे त्याची परंपराच लागली आहे. त्यामुळे याविषयी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. इतर वेळी नागरिक जमतात. परंतु देशाच्या सीमेवर संरक्षण करताना जवान शहीद झाले. याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. लोकांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला पाहिजे.-ताराबाई लड्डा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानीसलाम शहिदांना : शहीद जवानांना ‘लोकमत’समूह आणि प्रोझोनतर्फे रविवारी श्रद्धांजली