शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मराठवाड्यात तीन वर्षांत टँकरवर पावणेतीनशे कोटींचा चुराडा

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद मराठवाड्यातील शेकडो गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादमराठवाड्यातील शेकडो गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. गेल्या तीन वर्षांत मराठवाड्यात केवळ टँकरवर तब्बल पावणेतीनशे कोटी रुपये खर्च झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात सातत्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे विभागातील आठही जिल्ह्यांत दरवर्षी टंचाईचे चटके बसत आहेत. २०११ ते २०१३ या तीन वर्षांत मराठवाड्यात भीषण टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे या काळात हजारो गावांना प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला, तर काही गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गेल्या तीन वर्षांत मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत टंचाई आणि दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला. इतर जिल्ह्यांमध्ये टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले होते. त्यामुळे २०१३ साली मे महिन्यात विभागात तब्बल अडीच हजार टँकर सुरू करावे लागले. आजपर्यंतच्या इतिहासातील टँकरची ही सर्वोच्च संख्या होती. त्याआधी २०१२ मध्ये विभागात सुमारे दीड हजार टँकर सुरू करावे लागले. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार विभागात गेल्या तीन वर्षांत २ कोटी ७३ लाख रुपये खर्च झाला आहे. याशिवाय चालू वर्षीही मराठवाड्यात ठिकठिकाणी टँकर सुरू असून, त्यावर सुमारे २५ कोटी रुपये खर्च झाला आहे. मराठवाडा कधी होणार टँकरमुक्त?मराठवाड्यात पाणीटंचाई ही दरवर्षीचीच झाली आहे. जानेवारी-फेबु्रवारी महिना संपताच विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, वर्षानुवर्ष उलटूनही या गावांमध्ये उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे या गावांसाठी उन्हाळ्यात टँकर हाच तात्पुरता उपाय अवलंबिला जातो. राज्य सरकारने १९९५ साली टँकरमुक्त करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा अद्यापही प्रत्यक्षात आलेली नाही. उलट मराठवाड्यात दरवर्षी सातत्याने टँकरची संख्या वाढत आहे.  एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात टँकरवर गेल्या वर्षात ५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २०११-१२ साली ९ कोटी, २०१२-१३ साली २२ कोटी आणि २०१३-१४ मध्ये २८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. चालू आर्थिक वर्षातही टँकरवर सुमारे सुमारे दहा कोटींपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.