शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात अपहारप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात एक लाख, १४ हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, संस्थाचालकाविरूध्द अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे़पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर येथील अमर परमेश्वर-कदम यांनी तुळजापूर न्यायालयात अपहार प्रकरणी तक्रार दिली होती़ नळदुर्ग येथील सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरीअल उर्दू शाळेचे अध्यक्ष सय्यद तनवीरअली खतीब, सचिव जावेद वलीउल्ला काझी, मुख्यध्यापिका महेबुबी अ-रजाक शेख यांनी संगणमत करून शालेय पोषण आहारात १६ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर २०१३ व २१ आॅक्टोबर २०१३ या कालावधीत इंधन, भाजीपाला खर्चापोटी जवळपास एक लाख, १४ हजार रूपयांचा बनावट खर्च दाखवून अपहार करीत शासनाची फसवणूक केली़ तुळजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधीक्षक एस़आरग़ुरव, विस्तार अधिकारी गंगाधर सर्जे, केंद्रप्रमुख एम़एस़भोरे यांची नियुक्ती केली होती़ या पथकाने १३ सप्टेंबर रोजी शाळेस भेट देवून पंचनामा करून अहवाल दाखल केला होता़ पंचनाम्यादरम्यान पाच वर्गखोल्यात १ लाख, ६ हजार ३९४ रूपयांचा ७८ क्विंटल ५० किलो तांदळाचा अनाधिकृत साठा आढळून आला होता़ मिळालेल्या साठ्यातल १५ क्विंटल तांदळाची नासाडी झाली होती़ तर ३७ पॉकेट गोडेतेल कालबाह्य झाले होते़ असे असतानाही मुख्याध्यापिकेने तांदूळ संपल्याचा अहवाल वरिष्ठांना देत तांदळाची मागणी केली होती़ तांदूळ शिल्लक असतानाही ते शिजविण्यासाठीची मजुरी, भाजीपाला व इंधनाच्या खर्चाची मागणीही प्रशासनाकडे करून खर्ची टाकली होती़ याप्रकरणी सर्वस्तरातून कारवाईची मागणी होत असताना प्रशासनाने मात्र सोईस्करपणे भिजतघोंगडे ठेवले होते़ याबाबत कदम यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने ९ महिन्यानंतर संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशावरून वरील तिघाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एम़वाय़डांगे हे करीत आहेत़ (वार्ताहर)हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाकडून अद्याप कारवाई न करता भिजत घोंगडे कायम ठेवले आहे़ संस्थेने मुख्याध्यापिकेस यापूर्वीच निलंबित केले आहे़ तांदळाचा साठा शिल्लक असताना पुन्हा पुरवठा का केला, चौकशीत तांदूळ शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले असतानाही मजुरी, भाजीपाला व इंधनापोटी खर्ची केलेली रक्कम वसूल का केली नाही, अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्यानंतरही तांदूळ शिल्लक कसा राहिला यासह इतर अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.