शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

तीन महिन्यांचे नियोजन आत्तापासूनच करा...!

By admin | Updated: December 23, 2015 23:44 IST

जालना : आगामी पंधरा दिवसांत जिल्ह्यात मजुरांच्या हाताला कामे राहणार नसल्याने प्रशासनाने डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यांचे आत्तापासूनच नियोजन करावे.

जालना : आगामी पंधरा दिवसांत जिल्ह्यात मजुरांच्या हाताला कामे राहणार नसल्याने प्रशासनाने डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यांचे आत्तापासूनच नियोजन करावे. सर्वांच्या हाताला काम आणि पिण्याचे पाणी देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी बुधवारी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या सभेत दिल्या. यात कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याने कुचराई केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार संकेत त्यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी झालेल्या सभेत अध्यक्ष तुकाराम जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुकीम देशमुख, सभापती शहाजी राक्षे, लीलाबाई लोखंडे, संभाजी उबाळे रामेश्वर सोनवणे, बाळासाहेब वाकुळीकर, अ‍ॅड संजय काळबांडे उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषदेने दिलेल्या निधीतून संसद ग्राम योजनेतून भोकरदन तालुक्यातील राजूर गाव संपूर्ण हगणदारी मुक्त करून विविध लोकाभिमुख कामे ग्रामपंचायतीने केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सरपंच आणि सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राजूरसारखे मॉडेल सर्व जिल्ह्यात सुरू करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.संपूर्ण जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाईचे संकट निर्माण झाले असून, त्याचबरोबर ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचेही अनेक ठिकाणी तीन तेरा वाजले आहेत.यावर सदस्य उबाळे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ९७२ गावांत एमआरजीएसच्या माध्यमातून तलाव परिसरात विहिरी घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर खोतकर यांनी बीडीओंना सुचना देऊन त्यावर नियोजन करण्यासाठी सूचना केल्या.महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजनेतील कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. परंतु जिल्ह्यात केवळ २३६ कामे सुरू असल्याने अनेकांना रोजगार मिळत नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी वाकुळीकर यांनी केली. एमआरजीएसच्या माध्यमातून कामे वाढवून मजूरांच्या हाताला कामे उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)जिल्हात संभाव्य पाणी टंचाईची विविध कामे करण्यासाठी आत्तापर्यंत ५३ प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी फक्त १० प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता आंटद यांनी दिली. ४सध्या संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी आत्तापासूनच प्रशासनाचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी सांगितले. यासाठी विहिरींचे पुनर्भरण आणि नव्याने विहिरींचे प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.