शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

जलयुक्तच्या निधी खर्चास तीन महिन्यांची मुदतवाढ

By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST

रामेश्वर काकडे, नांदेड सर्व गावे २०१९ पर्यंत टंचाईमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा निधी मार्चअखेर खर्च करावयाचा होता.

रामेश्वर काकडे, नांदेड सर्व गावे २०१९ पर्यंत टंचाईमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा निधी मार्चअखेर खर्च करावयाचा होता. परंतु निविदा प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी पडून असून उपलब्ध निधी खर्च करण्यास जूनअखेरपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षासाठी १५ हजार ४८९ कामांचे उद्दिष्ट प्रस्तावित होते. त्यासाठी २८६ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. प्रस्तावित केलेल्या कामावर उपलब्ध निधी मार्चअखेर खर्च करणे अपेक्षीत होते. मात्र कामे करण्यासाठी आॅनलाईन टेंडर प्रक्रिया जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत सुरु राहिल्याने ई-टेंडरींग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब झाला. त्याचा परिणाम प्रस्तावित केलेली कामे तसेच उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करता आला नाही, त्यासाठी जलयुक्तची गतवर्षातील सर्व कामे पूर्ण करता यावी, यासाठी आता जून २०१६ पर्यंत म्हणजे तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अपूर्ण कामे पूर्ण करता येतील. मात्र प्रशासकीय यंत्रणेने कामांची गती वाढविणेही आवश्यक झाले आहे.२०१५ - २०१६ साठी एकूण १५ हजार ४८९ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु त्यापैकी मार्चपर्यंत ५२६३ ऐवढीच कामे पूर्ण झालेली आहेत. २८६ कोटी ७३ लाख निधीपैकी केवळ ५३ कोटी ६९ लाख रुपये खर्च झाले आहेत. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील २६१ गावांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी पहिल्या टप्यात ४० कोटी १४ लाखांचा विशेष निधी तर दुसऱ्या टप्यात २७ कोटी ८ लाख असा एकूण ६७ कोटी २२ लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतुद करण्यात आली होती. मात्र विशेष निधीपैकी केवळ २६ कोटी ३ लाख रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित विशेष तसेच इतर वेगवेगळ््या योजनातून प्राप्त झालेला निधी अद्यापही शिल्लक आहे.दुसऱ्या टप्यात २२६ गावांची निवड- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील २२६ गावे निवडली आहेत. सदर गावात अभियान राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. राज्यासाठी जवळपास १ हजार कोटी रुपयांचा तर नांदेड जिल्ह्यासाठी ४३ कोटी ६ लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्यात निवडलेल्या गावात येत्या महिनाभरानंतर जलयुक्तची विविध कामे सुरु करण्यात येतील, असे सांगण्यात आले.२०१५ ते २०१९ पर्यंत सर्व गावे टंचाईमुक्त करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील निवडलेल्या काही गावात कामे पूर्णत्वास गेली आहेत. परंतु अनेक गावात शंभर टक्के कामे पूर्ण झाली नाहीत. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत शेततळे, ठिबक, विहिर बोअर पूनर्भरण, नाला खोलीकरण, सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, अर्दन स्ट्रक्चर, गाळ काढणे, पाझर तलाव, तलाव दुरुस्ती आदी विविध कामे करण्यात येत आहेत.