संजय तिपाले , बीडसंपूर्ण क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला असला तरी बीड जिल्ह्यात अजूनही सुमारे तीन लाख कुटुंबाकडे शौचालयेच नाहीत. २०१५ पासून पुढे दरवर्षी ७५ हजार शौचालये बांधले तरच २०१९ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होऊ शकतो. यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग कामाला लागला आहे.जिल्ह्यात एकूण ४ लाख ११ हजार ३०१ इतकी कुटुंबसंख्या आहेत. पैकी १ लाख १३ हजार ९१६ इतक्या कुटुंबाकडे शौचालये आहेत. परंतु २ लाख ९७ हजार ३८५ इतक्या कुटुंबाकडे शौचालये नाहीत. त्यामुळे या कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रात:र्विधीसाठी उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नाही. शौचालयाअभावी स्वच्छता मोहिमेला पीळ बसत आहे. स्वच्छता मोहीम गतिमान करताना शौचालयाशिवाय पुढे जाता येणार नाही. यासाठी आता २०१९ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक वर्षी ७५ हजार इतकी शौचालये उभारावी लागणार आहेत. २०१५-१६ या वर्षासाठी ७४ हजार ३५६ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे.४सीईओ नामदेव ननावरे यांनी स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. जि. प. च्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना शौचालय बांधणे सक्तीचे केले आहे. ४२०१९ पर्यंत जिल्हा पाणंदमुक्त होईल, असे सांगून ननावरे म्हणाले की, शौचालयाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीने कामाला लागले आहे. ४लोकांनीही दोन पाऊले पुढे येत योजनांचा फायदा घेत शौचालय उभारून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.४पाणी व स्वच्छता मिशनचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे म्हणाले की, २०१५ मध्ये बीपीएल मधील १९ हजार ७५१ तर एपीएलमधील ५४ हजार ५९५ इतकी शौचालये बांधायची आहेत. ४विभागामार्फत सामान्यांपर्यंत लाभ पोहचावा यासाठी सर्व सहकार्य केले जाते. शौचालय अनुदानातही वाढ झाली आहे. ४याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी अटीही शिथील करण्याचे प्रयत्न आहेत. जनजागृती करून प्रत्येक कुटुंबापर्यंत लाभ पोहोचविण्यात येणार आहे.
तीन लाख कुटुंबे शौचासाठी उघड्यावर !
By admin | Updated: December 24, 2014 01:02 IST