शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ग्रामीण राजकारणाच्या धुराळ्यात तीन कोटींचा सरकारी चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत ग्रामविकास खात्याकडून ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत ग्रामविकास खात्याकडून यासाठी सुमारे तीन कोटी दोन लाख रुपये खर्च होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक व्यवस्थापन खर्चात कपात झाली आहे. असे असले तरी निवडणूक नियोजनासाठी जेवढा खर्च लागणार आहे, तेवढा करावाच लागणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ८६५ पैकी ६१८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ जानेवारी असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हे वाटप करण्यात येणार आहेत. ५ जानेवारीपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा. ते सायं.५.३० वा. या वेळेत मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

कशावर किती होतो प्रशासकीय खर्च

उमेदवारी अर्ज स्वीकारणे, मतपत्रिका छापणे, ईव्हीएम वाहतूक, कर्मचारी भत्ते आदींसह भोजन, आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशासकीय खर्च केला जातो. स्टेशनरी, ईव्हीएम बॅटरीसह इतर खर्चदेखील प्रशासकीय यंत्रणेला करावा लागतो.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

जिल्ह्यात ६१८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

प्रती ग्रामपंचायत होणारा प्रशासकीय खर्च

प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४९ हजार रुपये प्रशासकीय खर्च होणार आहे.

जिल्ह्याला लागणारा एकूण प्रशासकीय खर्च

जिल्ह्यात तीन कोटी दोन लाख रुपयांचा होणार खर्च

मागील निवडणुकीचाच खर्च मिळेना

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात दोन कोटी रुपयांच्या आसपास खर्च झाला होता

त्यातील बहुतांश रक्कम मध्यंतरी मिळाली होती. उर्वरित रक्कम किती शिल्लक आहे, याची माहिती सर्वपातळीवरून घ्यावी लागेल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

पहिला टप्पा मिळाला आहे

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी टप्याटप्याने प्रशासकीय खर्च भागविला जाणार आहे. ४९ हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मिळतील, असे सांगण्यात आले आहे. १० हजार रुपयांचा पहिला टप्पा मिळाला आहे.

रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन