शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

हजार विहिरी रखडल्या !

By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST

सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून,

सितम सोनवणे , लातूरजिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून, सध्याला तब्बल २ हजार २१५ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण आहेत. नव्हे, या विहिरी रखडल्या आहेत. या विहिरी झाल्या असत्या तर टंचाईच्या काळात मदत झाली असती.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यात २००८ पासून विविध कामे सुरु करण्यात आली़ यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहीर, रस्ता आदी कामे सुरु करण्यात आली होती़ मागील ७ वर्षांत लातूर जिल्ह्यात ५ हजार ८२७ सिंचन विहीर खोदकामास परवानगी देण्यात आली़ यातील केवळ ३ हजार ६१२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत़ तर २२१५ विहिरींचे कामे अद्यापही अपूर्णच आहेत़ या अपूर्ण कामामध्ये अहमदपूर तालुक्यात ५४४ विहिरींची कामे सुरु केले होते़ त्यापैकी ३१४ विहिरी पूर्ण झाल्या़ तर २०३ विहिरी अपूर्ण आहेत़ औसा तालुक्यात ५०७ पूर्ण तर ४०५ अपूर्ण, चाकूर - २६० पूर्ण तर २५८ अपूर्ण, देवणी १८२ पूर्ण तर ४९० अपूर्ण, जळकोट २८१ पूर्ण तर ११६ अपूर्ण, लातूर ३८७ पूर्ण तर १५६ अपूर्ण, निलंगा ४५० पूर्ण तर १९० अपूर्ण, रेणापूर ३४४ पूर्ण तर ६६ अपूर्ण, शिरुर अनंतपाळ १५१ पूर्ण तर १५४ अपूर्ण, उदगीर ७०९ पूर्ण तर १७७ अपूर्ण आहेत़ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची व्यवस्था होईल़