शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

आताच साडेबारा हजार लोकांची तहान टँकरवर

By admin | Updated: October 22, 2014 01:31 IST

औरंगाबाद : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.

औरंगाबाद : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे प्रशासनाने काही तीव्र टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील साडेबारा हजार लोकसंख्येची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सद्य:स्थितीत नऊ टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात ८ आणि वैजापूर तालुक्यात १ टँकर सुरू आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाळा संपताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.विशेषत: पैठण आणि वैजापूर या दोन तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक आहे. पैठण तालुक्यातील दादेगाव, सोनवाडी, हर्षी बु., थेरगाव, हर्षी खु. तसेच वैजापूर तालुक्यातील बाबतारा या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असलेल्या गावांची एकूण लोकसंख्या १२ हजार ४०२ इतकी आहे. टँकरबरोबरच विहीर अधिग्रहणालाही सुरुवात झाली आहे. प्रशासनाने वैजापूर तालुक्यात एक विहीर अधिग्रहित केली आहे. ३९ टक्केकमी पाऊसजिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७५ मिमी आहे. प्रत्यक्षात केवळ ४१२ मिमी म्हणजे वार्षिक सरासरीच्या अवघा ६१ टक्केच पाऊस झाला आहे. सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ५८८ मिमी, तर सर्वांत कमी पैठण तालुक्यात ३०९ मिमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ४१४ मिमी, फुलंब्री तालुक्यात ४२७ मिमी, वैजापूर तालुक्यात ३३८ मिमी, गंगापूर तालुक्यात ३१३ मिमी, खुलताबाद तालुक्यात ३२८ मिमी, सिल्लोड तालुक्यात ५१९ मिमी, कन्नड तालुक्यात ४७८ मिमी पाऊस झाला आहे.टंचाई भीषण होण्याची शक्यताजिल्ह्यात गतवर्षी डिसेंबरच्या शेवटी टँकर सुरू करण्याची गरज पडली होती. मात्र, यंदा अपुऱ्या पावसामुळे सप्टेंबरच्या अखेरीसच टँकर सुरू झाले आहेत. शिवाय यंदा भूजल पातळी खूप खालावलेली असल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात मागील वर्षीपेक्षाही जास्त भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.