शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

आताच साडेबारा हजार लोकांची तहान टँकरवर

By admin | Updated: October 22, 2014 01:31 IST

औरंगाबाद : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.

औरंगाबाद : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे प्रशासनाने काही तीव्र टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील साडेबारा हजार लोकसंख्येची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सद्य:स्थितीत नऊ टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात ८ आणि वैजापूर तालुक्यात १ टँकर सुरू आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाळा संपताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.विशेषत: पैठण आणि वैजापूर या दोन तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक आहे. पैठण तालुक्यातील दादेगाव, सोनवाडी, हर्षी बु., थेरगाव, हर्षी खु. तसेच वैजापूर तालुक्यातील बाबतारा या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असलेल्या गावांची एकूण लोकसंख्या १२ हजार ४०२ इतकी आहे. टँकरबरोबरच विहीर अधिग्रहणालाही सुरुवात झाली आहे. प्रशासनाने वैजापूर तालुक्यात एक विहीर अधिग्रहित केली आहे. ३९ टक्केकमी पाऊसजिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७५ मिमी आहे. प्रत्यक्षात केवळ ४१२ मिमी म्हणजे वार्षिक सरासरीच्या अवघा ६१ टक्केच पाऊस झाला आहे. सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ५८८ मिमी, तर सर्वांत कमी पैठण तालुक्यात ३०९ मिमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ४१४ मिमी, फुलंब्री तालुक्यात ४२७ मिमी, वैजापूर तालुक्यात ३३८ मिमी, गंगापूर तालुक्यात ३१३ मिमी, खुलताबाद तालुक्यात ३२८ मिमी, सिल्लोड तालुक्यात ५१९ मिमी, कन्नड तालुक्यात ४७८ मिमी पाऊस झाला आहे.टंचाई भीषण होण्याची शक्यताजिल्ह्यात गतवर्षी डिसेंबरच्या शेवटी टँकर सुरू करण्याची गरज पडली होती. मात्र, यंदा अपुऱ्या पावसामुळे सप्टेंबरच्या अखेरीसच टँकर सुरू झाले आहेत. शिवाय यंदा भूजल पातळी खूप खालावलेली असल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात मागील वर्षीपेक्षाही जास्त भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.