शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

माती परीक्षणाकडे हजारो शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे.

चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीमध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत, हे जर कळाले तर सुयोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढविता येते. मात्र शेतकर्‍यांची उदासीनता व माती परीक्षण संदर्भातील जनजागृतीअभावी चापोली परिसरातील हजारो शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्न घटकांची गरज असते. ही गरज रासायनिक खताद्वारे पुरविली जाते. प्रमाणशीर खते नाही दिल्यास पिके चांगली येत नाहीत. परिणामी, अनावश्यक खर्चात वाढ होते. माती परीक्षणाने पिके वाढीसाठी जे आवश्यक घटक आहेत, त्यांचे जमिनीमधील प्रमाण कळते. त्यानुसार जे घटक जमिनीमध्ये कमी प्रमाणात आहेत, त्याच घटकांचा पुरवठा केल्यास बचत होईल व उत्पन्नही वाढेल. शेतकरी हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून असतो. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे गणित चुकते. जेवढा पैसा घातला आहे, तेवढाही निघत नाही व पुढील हंगामासाठी परत कर्जबाजारी होऊन खत-बियाणे घ्यावे लागतात. मागील तीन ते चार वर्षांचा विचार केला तर आज खताचे भाव दुपटीने वाढले आहेत. जर शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केली तर अनावश्यक खर्चाला लगाम लागू शकतो. त्यासाठी जर शेतकर्‍यांनी माती परीक्षण केले तर जे घटक जमिनीत कमी प्रमाणात आहेत, तेवढ्याच घटकाचा पुरवठा केला तर खतावरील अनावश्यक खर्च टाळला जाईल व पिकाच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल. लातूर येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा असून, मातीमधील तीन घटक तपासणीसाठी २५ रुपये, विशेष १६ घटकांच्या तपासणीसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाते. खतावरील अनावश्यक खर्चाचा विचार केला तर हे शुल्क कमी आहे. मात्र शेतकर्‍यांची उदासीनता व जनजागृतीच्या अभावामुळे माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) माती परीक्षणाबाबत जनजागृती करू... कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. परंतु, याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती न केल्यामुळे शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविली आहे. परंतु, याबाबत ग्रामसभेत बैठक घेऊन सोमवारपासून जनजागृती करणार असल्याचे कृषी सहायक एच.डी. रोकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.