शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

माती परीक्षणाकडे हजारो शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे.

चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीमध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत, हे जर कळाले तर सुयोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढविता येते. मात्र शेतकर्‍यांची उदासीनता व माती परीक्षण संदर्भातील जनजागृतीअभावी चापोली परिसरातील हजारो शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्न घटकांची गरज असते. ही गरज रासायनिक खताद्वारे पुरविली जाते. प्रमाणशीर खते नाही दिल्यास पिके चांगली येत नाहीत. परिणामी, अनावश्यक खर्चात वाढ होते. माती परीक्षणाने पिके वाढीसाठी जे आवश्यक घटक आहेत, त्यांचे जमिनीमधील प्रमाण कळते. त्यानुसार जे घटक जमिनीमध्ये कमी प्रमाणात आहेत, त्याच घटकांचा पुरवठा केल्यास बचत होईल व उत्पन्नही वाढेल. शेतकरी हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून असतो. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे गणित चुकते. जेवढा पैसा घातला आहे, तेवढाही निघत नाही व पुढील हंगामासाठी परत कर्जबाजारी होऊन खत-बियाणे घ्यावे लागतात. मागील तीन ते चार वर्षांचा विचार केला तर आज खताचे भाव दुपटीने वाढले आहेत. जर शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केली तर अनावश्यक खर्चाला लगाम लागू शकतो. त्यासाठी जर शेतकर्‍यांनी माती परीक्षण केले तर जे घटक जमिनीत कमी प्रमाणात आहेत, तेवढ्याच घटकाचा पुरवठा केला तर खतावरील अनावश्यक खर्च टाळला जाईल व पिकाच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल. लातूर येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा असून, मातीमधील तीन घटक तपासणीसाठी २५ रुपये, विशेष १६ घटकांच्या तपासणीसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाते. खतावरील अनावश्यक खर्चाचा विचार केला तर हे शुल्क कमी आहे. मात्र शेतकर्‍यांची उदासीनता व जनजागृतीच्या अभावामुळे माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) माती परीक्षणाबाबत जनजागृती करू... कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. परंतु, याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती न केल्यामुळे शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविली आहे. परंतु, याबाबत ग्रामसभेत बैठक घेऊन सोमवारपासून जनजागृती करणार असल्याचे कृषी सहायक एच.डी. रोकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.