शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

माजलगाव तालुक्यात विजेअभावी हजारो एकर ऊस सुकला

By admin | Updated: June 13, 2014 00:32 IST

माजलगाव: तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली.

माजलगाव: तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली. लावण्यात आलेला ऊस मात्र वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने जळून चालला आहे. वीज वितरणच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.माजलगाव तालुक्यात माजलगाव सहकारी साखर कारखाना व जय महेश कारखाना हे दोन साखर कारखाने असून, सावरगाव येथे छत्रपती कारखाना देखील या हंगामामध्ये उसाचे गाळप करणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी शेतीला पाणीपुरवठा करण्याजोगी असतानाही विजेअभावी शेतातील विद्युत पंप, विंधन विहिरी बंद आहेत. वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील हजारो एकरवरील ऊस पाणी असूनही विजेअभावी जळून जात आहे.अगोदरच मागील महिन्यात झालेल्या गारपिटीत व वादळी वाऱ्यात उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी कसाबसा सावरला होता. मात्र आता वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून जात आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)मागील दोन ते तीन महिन्यांपासून येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील सहायक अभियंता पद रिक्त आहे, त्यामुळे अडचणी सोडविण्यासाठी अद्यापही सक्षम अधिकारी मिळालेला नाही.