शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

सामूहिक विवाह सोहळ्यात राहणार एक हजार जोडपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:37 IST

जालना : जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना मदत व्हावी,

जालना : जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने जालन्यात तब्बल १००० जोडप्यांचा सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.शिवस्मारक समितीच्या वतीने १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्याचे कार्याध्यक्ष कल्याणचे भाजपा आ. नरेंद्र पवार हे राहतील. सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. या शुभमंगल सोहळ्यास येण्यासाठी मराठवाड्यातील वधू-वरांकडील मंडळींसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगून वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य आणि मणि व मंगळसूत्र देण्यात येणार आहे. सोहळ्यात १ लाख वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांची नोंदणी १० एप्रिलपर्यंत राहणार असून, तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे अर्जाद्वारे नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले. पत्र परिषदेस जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उद्योगपती घनश्याम गोयल, कल्याणचे आ. नरेंद्र पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास २१ जिल्ह्यांतील दुष्काळाची दाहकता पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना जिल्हानिहाय दौरे करून अधिवेशनापूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचीच धास्ती घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसने मंत्र्यांच्या या दौऱ्याला विरोध सुरु केल्याचे टीकास्त्र भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सोडले. तथापि राष्ट्रवादीच्या या विरोधाला न जुमानता मंत्र्यांचे राज्यभर दौरे होतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.४जालना शहरातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. दानवे म्हणाले की, राज्यातील सुमारे २१ जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत ही दाहकता अधिक आहे. त्यामुळे दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने यंत्रणा सज्ज केली असून, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, विद्यार्थ्यांची फी माफी, कर्जाचे पुनर्गठण, मनरेगामध्ये मजुरांना कामे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत, असेही खा. दानवे म्हणाले.