शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘त्या’ शाळांना चपराक

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण संचालक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत. यापुढे जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच कोणत्याही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करताना शासन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, याकडे प्रभारी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांनी एका परिपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे. अनेक जि. प. तसेच काही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करून सरसकट इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करीत आहेत. यासंबंधीची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल आणि विनाअनुदानित शाळा कृती समितीने प्रभारी शिक्षण उपसंचालक तुपे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तुपे यांनी विभागातील सर्व जि. प. तसेच खाजगी शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे एक परिपत्रक जारी केले. परिपत्रकात नमूद केले आहे की, ज्या ठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे, पण त्या शाळेपासून १ किलोमीटरच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा इयत्ता ५ वीचा वर्ग नसेल, तर अशा शाळांनी ५ वीचा वर्ग सुरू करावा. मात्र, ज्याठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे. याशिवाय शाळेपासून १ किलोमीटर परिघामध्ये दुसऱ्या शाळेत इयत्ता ५ वीचा वर्गदेखील सुरू आहे. अशा शाळांमध्ये ५ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. याप्रमाणे ज्या शाळेमध्ये १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग आहेत; पण शाळेपासून ३ किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग नाही. अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येईल. मात्र, अशा शाळांच्या ३ किलोमीटर अंतराच्या परिघात अन्य शाळांमध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग सुरू असेल, तर अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. शासन निर्णयातील अटी व शर्र्तींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.