शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाळांना चपराक

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण संचालक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत. यापुढे जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच कोणत्याही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करताना शासन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, याकडे प्रभारी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांनी एका परिपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे. अनेक जि. प. तसेच काही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करून सरसकट इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करीत आहेत. यासंबंधीची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल आणि विनाअनुदानित शाळा कृती समितीने प्रभारी शिक्षण उपसंचालक तुपे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तुपे यांनी विभागातील सर्व जि. प. तसेच खाजगी शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे एक परिपत्रक जारी केले. परिपत्रकात नमूद केले आहे की, ज्या ठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे, पण त्या शाळेपासून १ किलोमीटरच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा इयत्ता ५ वीचा वर्ग नसेल, तर अशा शाळांनी ५ वीचा वर्ग सुरू करावा. मात्र, ज्याठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे. याशिवाय शाळेपासून १ किलोमीटर परिघामध्ये दुसऱ्या शाळेत इयत्ता ५ वीचा वर्गदेखील सुरू आहे. अशा शाळांमध्ये ५ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. याप्रमाणे ज्या शाळेमध्ये १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग आहेत; पण शाळेपासून ३ किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग नाही. अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येईल. मात्र, अशा शाळांच्या ३ किलोमीटर अंतराच्या परिघात अन्य शाळांमध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग सुरू असेल, तर अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. शासन निर्णयातील अटी व शर्र्तींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.