शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘त्या’ दांडीबहाद्दर बीएलओंना अभय

By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST

औरंगाबाद : निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गैरहजर राहिले.

औरंगाबाद : निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गैरहजर राहिले. त्यामुळे अनेक नागरिकांना मतदान केंद्रांवरुन नोंदणीशिवाय माघारी जावे लागले. मात्र, आठवडा उलटूनही जिल्हा प्रशासनाने गैरहजर बीएलओंवर कोणतीही कारवाई केलेली नाही. विशेष नोंदणी मोहिमेच्या दिवशी जिल्ह्यात नेमके किती बीएलओ गैरहजर होते याची साधी आकडेवारीही जमा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केलेले नाही. मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने नावे वगळल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर याविरोधात काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आयोगाने नंतर ही चूक सुधारण्यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ९ जून ते ३० जून या काळात मतदार नोंदणी मोहीम राबविली गेली. यादरम्यान २८ आणि २९ जून रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ उपस्थित राहतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही दिवस अनेक मतदार नोंदणीसाठी जवळच्या मतदान केंद्रांवर पोहोचले. लोकमतने दोन्ही दिवस शहरातील काही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तेव्हा शहरातील अनेक केंद्रांवर बीएलओ पोहोचलेच नसल्याचे दिसून आले. याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर सर्व तहसील कार्यालयांकडून गैरहजर बीएलओंचा अहवाल मागविण्यात आला. मात्र, आता आठवडा उलटला तरी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. निवडणूक शाखेकडे विचारणा केली असता आतापर्यंत केवळ एकाच तालुक्याचा अहवाल आला असून, उर्वरित ८ तालुक्यांनी कोणताही अहवाल सादर केलेला नसल्याचे सांगण्यात आले. 1आतापर्यंत औरंगाबाद तहसील कार्यालयाकडूनच बीएलओंच्या गैरहजेरीचा अहवाल आला आहे. त्यातही केवळ एकच बीएलओ गैरहजर होता, असे दाखविण्यात आले आहे. नोंदणी मोहिमेच्या दिवशी शहरातील ८०० पैकी अनेक केंद्रांवर बीएलओ उपस्थित नव्हते. तहसील कार्यालयाने सुमारे ३५ केंद्रांवर बीएलओ गैरहजर होते, असे सुरुवातीला सांगितले होते. मात्र, आता हा आकडा एकवर आला आहे. 2याविषयी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी अजब खुलासा केला. काही बीएलओ केंद्रांवर नसल्याचे दिसून आले. मात्र, नंतर क्रॉस चेक केले तेव्हा ते दुसरीकडे बसले होते, अशी माहिती समोर आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. बीएलओ केंद्र सोडून दुसरीकडे बसणार होते तर मग सर्व केंद्रांवर मतदार नोंदणी केली जाणार असल्याचे आधी का जाहीर केले. बीएलओंच्या गैरहजेरीमुळे त्या दिवशी माघारी जावे लागलेल्या नागरिकांचे काय, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तहसीलची बनवाबनवी1मतदार नोंदणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. 2लवांडे यांनी काही केंद्रांना भेटी दिल्या तेव्हा त्यातही दोन केंद्रांवर बीएलओ गैरहजर आढळल्याचे दिसून आले. या बीएलओंवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र, आता त्यातील एका बीएलओला हजर दाखविण्याचे काम तहसील कार्यालयाने केले आहे. गैरहजर बीएलओंचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व तहसील कार्यालयांना दिले होते; पण आतापर्यंत एकाच तहसीलचा अहवाल आला आहे. उर्वरित तहसीलला अहवाल सादर करण्यासाठी दुसऱ्यांदा पत्र पाठविले आहे. अहवाल आल्यावरच कारवाई होऊ शकेल. - शशिकांत हदगल, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी