शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ठोंबरे, पवार, देशमुख यांना आमदारकीची लागली ‘लॉटरी’

By admin | Updated: October 20, 2014 00:33 IST

व्यंकटेश वैष्णव ,बीड विधानसभा निवडणुकीत बीड सोडता इतर पाच विधानसभा मतदार संघात भाजपने बाजी मारली़ पाच पैकी तीन नविन उमेदवारांना आमदारकीची संधी मिळाली आहे़ ए

व्यंकटेश वैष्णव ,बीडविधानसभा निवडणुकीत बीड सोडता इतर पाच विधानसभा मतदार संघात भाजपने बाजी मारली़ पाच पैकी तीन नविन उमेदवारांना आमदारकीची संधी मिळाली आहे़ एकूनच तिघांच्या गळ्यात जनतेने पहिल्यांदाच आमदारकीची माळ घातली आहे़बीड विधानसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघापैकी बीड विधानसभा मतदार संघातच राष्ट्रवादी कॉंग्रेसला जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून विजय मिळविता आला़ इतर गेवराई, केज व माजलगाव, परळी,आष्टी मतदार संघात भाजपाने विजय मिळविला़ यामध्ये परळीच्या विजयी उमेदवार पंकजा मुंडे व आष्टीचे भीमराव धोंडे सोडता केजच्या संगिता ठोंबरे, गेवराईचे अ‍ॅड़ लक्ष्मण पवार व माजलगावचे आऱ टी़ देशमुख हे पहिल्यांदाच आमदार झाले आहे़ ही संधी त्यांना यावेळी जनतेने दिली आहे़ राज्यात कुठल्याच पक्षाला बहुमत नसले तरी भाजप-शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात असे संकेत आहेत़ बीड जिल्हयात तीन भाजपचे उमेदवार पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत़ तर परळीच्या आ़ पंकजा मुंडे व आष्टीचे आ़ भिमराव धोंडे हे अनुभवी आहेत़ पंकजा मुंडे यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे तर धोंडे हे यापुर्वी पंधरा वर्ष आमदार राहिलेले आहे़ आत मंत्रीमंडळात बीड पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना संधी दिली जाते की, अनुभवी असलेले पंकजा मुंडे व धोंडे यांना संधी मिळते़ हे पहाणे औचुक्याचे ठरणार आहे़ गेवराईचे भाजप चे आ़ अ‍ॅड़ लक्ष्मण पवार हे पहिल्यांदाच आमदार झालेले असले तरी पवार यांचे मताधिक्य पंकजा मुंडे यांच्या दुप्पट म्हणजेच ६० हजार १ मताने विजयी झालेले आहेत़ पवार यांचे मताधिक्य इतर उमेदवारांच्या तुलनेत महत्वाचे आहे़ त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळते का ते पहावे लागणार आहे़केजच्या भाजप उमेदवार अनुसुचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत़ याशिवाय राकॉचे माजी आ़ पृथ्वीराज साठे सोडता १९९९ पासून केजच्या आमदाराकडे कायम मंत्रीपद राहिलेले आहे़ यावेळी केजमध्ये भाजपचा उमेदवार आहे़ विशेष म्हणजे राज्यात देखील भाजप-युतीचे सरकार स्थापन होऊ शकते़ यामुळे केजच्या भाजप आ़ संगिता ठोंबरे पहिल्यांदाच आमदार झालेल्या असल्या तरी त्यांना मंत्री मंडळात स्थान मिळू शकते़ तसेच मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असलेल्या पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली तरी त्यांच्यावर कॅबिनेट मधील एखाद्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी येऊ शकते़