शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दुष्काळाच्या धास्तीने तीस बैलजोड्या विकल्या !

By admin | Updated: November 24, 2014 00:35 IST

लोहारा : तालुक्यातील भातागळी येथे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण असून, खरीप हंगाम वाया गेला, रबीची आशा नाही. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यामुळे

लोहारा : तालुक्यातील भातागळी येथे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण असून, खरीप हंगाम वाया गेला, रबीची आशा नाही. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यामुळे सोन्यासारखी जनावरे शेतकरी कवडीमोल किंमतीत विकत असून, अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. तेरणा नदीकाठी वसलेले तीन हजार लोकसंख्येचे भातागळी हे गाव. गावचा मुख्य व्यवसाय शेती. यंदा लोहारा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. परंतु खरिपातील पिकांनीही दगा दिला. पेरणीसाठी झालेला खर्चही निघाला नाही. आता रबीच्या तोंडावरही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर रबीची पेरणी करणेही या भागातील शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेले पशुधन विक्रीसाठी काढले. गावातील सुमारे तीस ते पस्तीस बैलजोड्या अक्षरश: कवडीमोल दराने विकल्या गेल्याने शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही करतात. याच अनुषंगाने येथे पाच दूध संकलन केंद्रही होते. गावातून दररोज पाचशे ते सहाशे लिटर दूध संकलित होत होते. परंतु, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे अनेकांनी दुभती जनावरेही विकली असून, त्यामुळे या भागातील दूध संकलनही कमी झाले आहे. गावातील दूध संकलनाचा आकडा पाचशे वरून पन्नास ते साठ लिटरवर आला आहे. मजुरीसाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतरित होत असल्याने गावही ओस पडत आहे. गावात रोजगार निर्मिती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)शेतात कामे नाहीत, अशा परिस्थितीत मजुरांच्या कामाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. कामाच्या शोधार्थ भातागळीतील अनेक मजूर औसा, निलंगा, उमरगा तालुक्याकडे स्थलांतरित होत असल्याचेही दिसून येत आहे. भातागळीत सरकारी व खाजगी दूध संकलन केंद्राची संख्या पाचवर आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गायी, म्हशी पालनाचा व्यवसाय येथे केला जातो. परंतु, दुष्काळी परिस्थितीत जनावरे विकावी लागल्याने दूध संकलन केंद्रही गुंडाळण्यात आले आहे.वर्षाकाठी ७० हजाराच्या घरात पगार देऊन शेतकरी सालगडी ठेवतात. परंतु यंदा शेतकऱ्यांच्या हाती यंदा काहीच लागले नसल्याने शेतकऱ्यांनी सालगडी ठेवले नसून, हे सालगडी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित होत आहेत.