शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

‘ते’ वीज बिल भरण्याची गरज नाही

By admin | Updated: December 12, 2014 00:55 IST

औरंगाबाद : शहरातील वीज पुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर जीटीएलकडे वीज बिल भरलेल्या वीज ग्राहकांना पुन्हा महावितरणकडे वीज बिल भरण्याची गरज नाही.

औरंगाबाद : शहरातील वीज पुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर जीटीएलकडे वीज बिल भरलेल्या वीज ग्राहकांना पुन्हा महावितरणकडे वीज बिल भरण्याची गरज नाही. ही माहिती महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता शंकर शिंदे यांनी दिली.महावितरणने जीटीएलकडून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे. जीटीएलने वीजपुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर काही मोठ्या वीज ग्राहकांचे (उद्योजकांचे) वीज बिल घेतले आहे. कंपनी ही माहिती महावितरणला देण्याची टाळाटाळ करीत आहे. हे वृत्त लोकमतने हॅलो औरंगाबादमध्ये प्रकाशित केले होते. महावितरणने शहरातील वीज ग्राहकांकडून बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना बिल भरता यावे म्हणून पहिल्या टप्प्यात शहरात २२ ठिकाणी वीज बिल भरणा केंदे्र सुरू केली. काही उद्योजकांनी हस्तांतरणानंतर जीटीएलकडे बिल भरल्याची माहिती समोर आली. या मोठ्या ग्राहकांचे (उद्योजकांचे) चेक कंपनीने आपल्या खात्यावर जमा करून घेतले आहेत. मुख्य कार्यकारी अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले की, जीटीएलकडे शहरातील काही उद्योजकांनी हस्तांतरणानंतर वीज बिल भरले होते. ती माहिती कंपनीकडून घेण्यात येत आहे. जीटीएलने ४९ लाख रुपये हस्तांतरणानंतर घेतले आहेत. ज्या उद्योजकांनी जीटीएलकडे वीज बिल भरले आहे, त्यांच्याकडून पुन्हा ते बिल वसूल करण्यात येणार नाही. कंपनीकडून लवकरात लवकर ही माहिती घेण्यात येईल.उद्योजक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी वीज पुरवठ्याविषयी बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये उद्योजकांनी विजेच्या समस्या मांडल्या. यावेळी ग्राहकांनी थकीत वीज बिल महावितरणच्या वीज बिल भरणा केद्रांवर भरावे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर लवकर भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता शिंदे यांनी केले. ३ वर्षांत १० हजार ग्राहकांनी बिल भरलेच नाहीऔरंगाबाद : शहराचा वीजपुरवठा साडेतीन वर्षे जीटीएलकडे होता. त्यापैकी तीन वर्षांत शहरातील १० हजार ग्राहकांंनी वीज बिल भरलेलेच नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंपनी काय करीत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने शहरातील वीजपुरवठा १५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतला आहे. यावेळी शहरातील वीज ग्राहकांकडे १३४ कोटी रुपये वीज बिल थकलेले होते. हे वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे. महावितरणने थकीत बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षात ३० हजार ग्राहकांनी बिल भरले नाही. या ग्राहकांकडे १०० कोटींची थकबाकी आहे. या ३० हजार ग्राहकांपैकी जवळपास १० हजार ग्राहकांनी तीन वर्षांपासून बिले भरली नाहीत. त्यांच्याकडे ५७ कोटी रुपये थकले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे, असे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले. मोहिमेत पहिल्या टप्प्यात २० दिवसांत साडेसहा हजार वीज ग्राहकांची जोडणी खंडित केली आहे. त्यापैकी २२०० ग्राहकांनी तात्काळ थकीत बिल भरले आहे. त्यांची वीज जोडणी करून देण्यात आली आहे.