शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सोयाबीन बियाणांच्या किंमतीत दीडपट वाढ

By admin | Updated: June 9, 2014 00:08 IST

महेबूब बक्षी , भादा गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ शेकडो हेक्टर्स जमिनीवरील पिके उद्धवस्त झाली़.

महेबूब बक्षी , भादागेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ शेकडो हेक्टर्स जमिनीवरील पिके उद्धवस्त झाली़ ते संकट अद्याप सरले नाही, तोवरच खरीप हंगामातील बियाणांच्या किंमतीत १००० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे़ सध्या खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे बियाणांच्या तजवीजीसाठी शेतकरी धावपळ करीत आहे़ भादा परिसरात सत्तर टक्के क्षेत्र खरीपाचे आहे़ फक्त पावसाळी पिके घेऊन वर्षभर कुटुंबाचा गाडा चालविणारे शेतकरी या भागात मोठ्या प्रमाणात आहेत़ परंतु, बि-बियाणांच्या भावामध्ये कमालीची वाढ झाल्याने पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे़ गतवर्षी सोयाबीन बियाणांचा दर १६५० ते १७०० रूपये बॅग प्रमाणे होता़ पण यंदा मात्र या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १ हजार रूपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागत आहे़ महाबीजच्या ३० किलोच्या बॅगसाठी २३८५ रूपये, ईगल-२७००, ग्रीन गोल्ड-२५००, कृषीधन-२५०० असा दर आहे़ सम्राट डीएपी-११८३ ते ११९० दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी अधिकारी एस़एस़शिंदे यांनी दिली़ परंतु, या किमतीमध्ये बाजारामध्ये खते-बियाणे मिळत नाहीत़ सोयाबीनचाही तुटवडा आहे़ कृषी विभागाच्या वतीने घरगुती बियाणे वापरा, अशा सूचना देऊन महाबीज कंपनीची जाहिरात करत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे़परिणामी गारपीटग्रस्त शेतकऱ्याला खरीप हंगामाची पेरणी करणे अवघड जात आहे़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे़ त्यातच बियाणांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात विक्रीसाठी येणारे सोयाबीन बियाणे ५० टक्क्याने घटल्याने बियाणांचे दर वाढले आहेत़ शेतकऱ्याला गतवर्षी सोयाबीनला ३५०० ते ४००० रूपये भाव मिळाल्याने सीड प्लॉटधारकांनी वाढ केल्याची माहिती मिळाली आहे़ कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, बियाणे उपलब्ध होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे़ शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे पेरावीत़मागणी वाढली़़़यंदा बाजारात खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीनसाठी ९० टक्के मागणी असल्याने व्यापाऱ्यांनी वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच महामंडळाकडे १०० टक्के सोयाबीनचे पैैसे भरले आहेत़ परंतु, महामंडळाकडून २५ टक्के माल दिला जात आहे़ अद्यापही ७० टक्के बियाणे महामंडळाकडे शिल्लक असतानाही शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे़