शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

सोयाबीन बियाणांच्या किंमतीत दीडपट वाढ

By admin | Updated: June 9, 2014 00:08 IST

महेबूब बक्षी , भादा गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ शेकडो हेक्टर्स जमिनीवरील पिके उद्धवस्त झाली़.

महेबूब बक्षी , भादागेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ शेकडो हेक्टर्स जमिनीवरील पिके उद्धवस्त झाली़ ते संकट अद्याप सरले नाही, तोवरच खरीप हंगामातील बियाणांच्या किंमतीत १००० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे़ सध्या खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे बियाणांच्या तजवीजीसाठी शेतकरी धावपळ करीत आहे़ भादा परिसरात सत्तर टक्के क्षेत्र खरीपाचे आहे़ फक्त पावसाळी पिके घेऊन वर्षभर कुटुंबाचा गाडा चालविणारे शेतकरी या भागात मोठ्या प्रमाणात आहेत़ परंतु, बि-बियाणांच्या भावामध्ये कमालीची वाढ झाल्याने पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे़ गतवर्षी सोयाबीन बियाणांचा दर १६५० ते १७०० रूपये बॅग प्रमाणे होता़ पण यंदा मात्र या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १ हजार रूपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागत आहे़ महाबीजच्या ३० किलोच्या बॅगसाठी २३८५ रूपये, ईगल-२७००, ग्रीन गोल्ड-२५००, कृषीधन-२५०० असा दर आहे़ सम्राट डीएपी-११८३ ते ११९० दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी अधिकारी एस़एस़शिंदे यांनी दिली़ परंतु, या किमतीमध्ये बाजारामध्ये खते-बियाणे मिळत नाहीत़ सोयाबीनचाही तुटवडा आहे़ कृषी विभागाच्या वतीने घरगुती बियाणे वापरा, अशा सूचना देऊन महाबीज कंपनीची जाहिरात करत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे़परिणामी गारपीटग्रस्त शेतकऱ्याला खरीप हंगामाची पेरणी करणे अवघड जात आहे़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे़ त्यातच बियाणांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात विक्रीसाठी येणारे सोयाबीन बियाणे ५० टक्क्याने घटल्याने बियाणांचे दर वाढले आहेत़ शेतकऱ्याला गतवर्षी सोयाबीनला ३५०० ते ४००० रूपये भाव मिळाल्याने सीड प्लॉटधारकांनी वाढ केल्याची माहिती मिळाली आहे़ कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, बियाणे उपलब्ध होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे़ शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे पेरावीत़मागणी वाढली़़़यंदा बाजारात खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीनसाठी ९० टक्के मागणी असल्याने व्यापाऱ्यांनी वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच महामंडळाकडे १०० टक्के सोयाबीनचे पैैसे भरले आहेत़ परंतु, महामंडळाकडून २५ टक्के माल दिला जात आहे़ अद्यापही ७० टक्के बियाणे महामंडळाकडे शिल्लक असतानाही शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे़