शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे

By admin | Updated: March 29, 2016 00:53 IST

नजीर शेख , औरंगाबाद मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, यासाठी मोठा संघर्ष झालेला आहे. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. राज्य एकसंध राहावे; शिवाय बेळगाव

नजीर शेख , औरंगाबादमराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, यासाठी मोठा संघर्ष झालेला आहे. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. राज्य एकसंध राहावे; शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग महाराष्ट्रात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बीदर, कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव येथील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राज्यात सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या स्वतंत्र राज्याची भूमिका पुढे आली आहे. त्यावरून विदर्भात आंदोलनही सुरू झाले आहे. मराठवाड्यात काही कार्यकर्ते वगळता नेत्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात त्याची चर्चा नाही; परंतु नागरिकांमध्ये मराठवाड्याला विकास प्रक्रियेत डावलले गेल्याची भावना आहे. दुसऱ्या बाजूला बेळगाव, निपाणी, बीदर, भालकीसह महाराष्ट्र राज्य असायला हवे, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते गेली ५६ वर्षे लढा देत आहेत. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा राज्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर (पान २ वर)अखंड महाराष्ट्रातच आमचे हित आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडणार असतील तर आम्हाला कुणाचा आधार राहणार. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत असेच वाटते. राज्यातील विद्यमान सरकार राज्याचे तुकडे पाडणार असेल तर आम्ही महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या तोंडाने पाहावे. गेल्या ५० ते ५५ वर्षांचा आमचा लढा वाया जाणार नाही, हेदेखील महाराष्ट्रातील नेत्यांना पाहावे लागणार आहे. राज्याचे तुकडे झाल्यास उद्या कर्नाटकातील लोकही आमच्या मागण्यांची दखल घेणार नाहीत. आमदार संभाजी पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव