शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेस स्थगिती नाही

By admin | Updated: July 18, 2014 01:54 IST

औरंगाबाद : राज्यातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्याचा तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासनाला निर्देश दिलेले आहेत

औरंगाबाद : राज्यातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्याचा तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासनाला निर्देश दिलेले आहेत, असे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. व्ही. एल. आंचलिया यांनी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तीन आठवड्यांत शपथपत्र सादर करा, असे आदेश देत प्रतिवादी महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण संचालकांना नोटिसा काढल्या आहेत.अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्र सरकारने २४ जून २०१४ रोजी अध्यादेश जारी केला. त्यानुसार जेईई मेन परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांना ५० टक्के आणि राज्य बोर्ड परीक्षेत त्यांनी संपादन केलेल्या गुणांना ५० टक्के महत्त्माप (वेटेज) देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही प्रवेश प्रक्रिया पर्सेंटाईल पद्धतीने करण्याचेही त्यात नमूद करण्यात आले. त्यानुसार राज्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी १६ जुलै रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. पर्सेंटाईल प्रवेश पद्धतीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे नमूद करीत जळगाव येथील तनुश्री जयंत महाजन आणि अन्य १२ विद्यार्थ्यांनी अ‍ॅड. विनोद पाटील यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून प्रवेश प्रक्रियेला आव्हान दिले होते. खंडपीठासमोर बुधवारी याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्ही ही याचिका न्यायालयासमोर आली. अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तीन आठवड्यांत शपथपत्र सादर करा,असे निर्देश देत राज्याच्या तंत्रशिक्षण संचालक आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना नोटिसा काढल्या. यावेळी शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी बाजू मांडली.२९ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशतंत्रशिक्षण विभागाच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले की, अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन अणि राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाला दिले आहेत.शिवाय प्रवेश प्रक्रियेनुसार पहिल्या फेरीची यादी १६ जुलै रोजी संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तेव्हा आता या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देऊ नये, अशी विनंती केली. ती मान्य करण्यात आली.