शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पीएम केअर फंडातील खराब व्हेंटिलेटर्सची चौकशी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याचे आणि आयसीयूत वापरण्यायोग्य नसल्याचे समोर येऊन दोन आठवडे उलटूनही ...

औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याचे आणि आयसीयूत वापरण्यायोग्य नसल्याचे समोर येऊन दोन आठवडे उलटूनही त्यासंदर्भात कोणतीही चौकशीच होत नसल्याची स्थिती आहे. हे व्हेंटिलेटर केवळ दुरुस्त करण्याचा खटाटोप सुरू आहे. घाटीपाठोपाठ आता खाजगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे व्हेंटिलेटर परत पाठविण्याऐवजी कसेही करून हे व्हेंटिलेटर रुग्णांच्या माथी मारण्यावरच भर दिला जात आहे. पीएम केअर फंडातून घाटीला प्राप्त झालेल्या १५० व्हेंटिलेटरची अवस्था ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून समोर आणली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. लोकप्रतिनिधींनीही या वृत्तांची गंभीरतेने दखल घेत घाटीत पाहणी केली. तेव्हा व्हेंटिलेटरची अवस्था त्यांच्याही निदर्शनास आली. घाटीला मिळालेल्या १५० पैकी काही व्हेंटिलेटर्स परभणी, हिंगोली येथे देण्यात आले. तेथेही हे व्हेंटिलेटर पडूनच आहेत. पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर रुग्णांना वापरण्यायोग्य आहेत की नाही, यासंदर्भात राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करावी, हे व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य नसतील ते परत करावेत, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी केली आहे.

घाटी रुग्णालयात मात्र, अद्यापही या व्हेंटिलेटरच्या ना चौकशीसाठी, ना ऑडिटसाठी कोणी आले. या सगळ्यात एका रुग्णालयाने घाटीला काही व्हेंटिलेटर परत केले. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे कंपनीचे इंजिनिअर्स शहरात तळ ठोकून असून, घाटीत व्हेंटिलेटर दुरुस्त आणि अपग्रेड करण्यासाठी घाम गाळत आहेत. एका खाजगी रुग्णालयाला ३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर घेतल्यापासून ते विनावापर पडून आहेत. हे व्हेंटिलेटर तपासण्यासाठी रविवारी या रुग्णालयात इंजिनिअर्स पोहोचले. त्यांच्याकडून येथील व्हेंटिलेटर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

व्हेंटिलेटर परत घेऊन जावे, नवे मिळावे

आपल्यासाठी हे व्हेंटिलेटर भंगार आहेत. आताच्या परिस्थितीत व्हेंटिलेटर गरजेचे आहेत. नंतर व्हेंटिलेटर येऊन उपयोग होणार नाही. चौकशीत जे समोर येईल ते येईलच; पण त्याला किती दिवस लागतील, हा प्रश्न आहे. सध्या ही प्राथमिकता आहे की, हे व्हेंटिलेटर परत घेऊन जाऊन चांगले व्हेंटिलेटर दिले पाहिजे. त्या व्हेंटिलेटरची संख्या कमी असली तरी चालेल.

- खा. इम्तियाज जलील