शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कुंपणही नाही अन् वृक्षांना पाणीही नाही !

By admin | Updated: January 20, 2017 00:16 IST

लातूर : २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लातूर जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड करण्यात आली.

लातूर : २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लातूर जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात लातूर मनपाला १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९ हजार २०० वृक्ष मनपाने लावले. पण लावलेली झाडे जगविण्याचा कृती आराखडा कागदावरच आहे. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणचे वृक्ष पाण्याअभावी वाळून गेली आहेत. ‘कुंपनही नाही अन् पाणीही नाही...’ अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे ही झाडे वाळून गेली आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यात २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ९ लाख ८ हजारांचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड लातूर जिल्ह्यात झाली. जवळपास ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष जगविण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार कृती आराखडाही यंत्रणांनी दिला. मात्र वृक्ष जगविण्याकडे दुर्लक्ष केले. लातूर मनपाने ९ हजार २०० वृक्षांची लागवड शहरात विविध ठिकाणी केली आहे. रिंगरोड, अंबाजोगाई रोड, कव्हा नाका परिसर, अंबाजोगाई बसडेपो परिसर, स्वराजनगर, बार्शी रोड परिसर, शाहू चौक परिसर तसेच देशीकेंद्र विद्यालय परिसर व शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वृक्ष लागवड केली. मात्र या झाडांना ‘ना कुंपन ना पाणी’ अशी स्थिती आहे. (प्रतिनिधी)