शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कुंपणही नाही अन् वृक्षांना पाणीही नाही !

By admin | Updated: January 20, 2017 00:16 IST

लातूर : २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लातूर जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड करण्यात आली.

लातूर : २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लातूर जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात लातूर मनपाला १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९ हजार २०० वृक्ष मनपाने लावले. पण लावलेली झाडे जगविण्याचा कृती आराखडा कागदावरच आहे. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणचे वृक्ष पाण्याअभावी वाळून गेली आहेत. ‘कुंपनही नाही अन् पाणीही नाही...’ अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे ही झाडे वाळून गेली आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यात २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ९ लाख ८ हजारांचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड लातूर जिल्ह्यात झाली. जवळपास ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष जगविण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार कृती आराखडाही यंत्रणांनी दिला. मात्र वृक्ष जगविण्याकडे दुर्लक्ष केले. लातूर मनपाने ९ हजार २०० वृक्षांची लागवड शहरात विविध ठिकाणी केली आहे. रिंगरोड, अंबाजोगाई रोड, कव्हा नाका परिसर, अंबाजोगाई बसडेपो परिसर, स्वराजनगर, बार्शी रोड परिसर, शाहू चौक परिसर तसेच देशीकेंद्र विद्यालय परिसर व शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वृक्ष लागवड केली. मात्र या झाडांना ‘ना कुंपन ना पाणी’ अशी स्थिती आहे. (प्रतिनिधी)