शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

राणेंच्या प्रवेशावर निर्णय नाही

By admin | Updated: July 18, 2014 01:54 IST

औरंगाबाद : काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणे हे ४८ तासांमध्ये पक्षाचा राजीनामा देण्याची चर्चा कानावर आली आहे.

औरंगाबाद : काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणे हे ४८ तासांमध्ये पक्षाचा राजीनामा देण्याची चर्चा कानावर आली आहे. या काळात बहुधा ते पक्ष सोडतील; पण त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्याबाबत महाराष्ट्र कोअर कमिटीत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच आमच्याकडून तशा प्रकारची कोणतीही चर्चा राणेंसोबत झालेली नाही, असे स्पष्टीकरण विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे यांनी लोकमतशी बोलताना दिले. विविध पक्षांचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. परंतु ज्या नेत्यांच्या विरोधात जनक्षोभ आहे, त्यांना भाजपात प्रवेश नाही. तसा राज्य कोअर कमिटीचा निर्णय झालेला आहे. त्या नेत्यांना भाजपात घेण्यास आम्ही उत्सुक नाही, असेही आ.तावडे यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या मराठवाडा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी ते औरंगाबादेत आले होते. सरकारने आरक्षण देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मुळात तो निर्णय उशिरा घेतला. त्यामुळे समाजातील गरीब विद्यार्थी शैक्षणिक लाभांपासून वंचित राहिले आहेत. या आरक्षणाला पुढच्या वर्षापर्यंत स्थगिती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आ.तावडे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना आ.तावडे म्हणाले, स्वीट डीश न मिळाल्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी वीजपुरवठ्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई केली आहे का? सत्तेची मस्ती आहे. त्यामुळे असले प्रकार घडतात. अधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम केले पाहिजे. मात्र येथे उलटेच होत आहे. अधिकारी जनतेऐवजी नेत्यांसाठी काम करीत आहेत. एनए-४४ प्रकरणात हजारो कोटींचा घोटाळा राज्यात महायुतीचे सरकार आल्यास आघाडी सरकारने घाई-घाईने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल. एनए-४४ प्रकरणी सरकारने घेतलेला निर्णय हजारो कोटींच्या मोबदल्यात घेतल्याचा आरोप आ.तावडे यांनी केला.बिल्डरांच्या हिताचा तो निर्णय असून, नगरविकास खात्याने घेतलेल्या सर्व निर्णयाचा फेरविचार आमच्या सरकारच्या काळात केला जाईल. या निर्णयामागे मोठे लागेबांधे आहेत. हा निर्णय मागेच झाला असता तर राज्यात स्वस्त घरे मिळाली असती.निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय बिल्डरांना खुश करण्यासाठी असून, त्यामुळे सामान्य जनतेला काहीही फायदा होणार नस्ल्याचे आ.तावडे म्हणाले.