शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
4
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
5
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
6
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
7
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
8
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
9
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
10
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
11
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
12
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
13
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
14
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
15
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
16
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
18
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
19
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
20
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

आयुक्तालयातील अनेक पोलीस लाटत आहेत फुकटचा पगार!

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : कोणत्याही आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला सहा महिन्यांनंतर रुजू करून घ्यावे, असा एक नियम आहे;

औरंगाबाद : कोणत्याही आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला सहा महिन्यांनंतर रुजू करून घ्यावे, असा एक नियम आहे; परंतु औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात ४० पोलीस अधिकारी, कर्मचारी असे आहे की, ज्यांचे तीन- चार वर्षे उलटून गेले, तर अद्याप त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही. हे ४० जण आयुक्तालयात येतात, सही मारतात अन् घरी निघून जातात. फक्त सही मारण्यासाठी त्यांना ७५ टक्के पगार देऊन पोसण्याचे काम पोलीस आयुक्तालयाकडून सुरू आहे. आजघडीला औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील फौजदार ते निरीक्षक दर्जाचे पाच अधिकारी आणि ३५ कर्मचारी, असे एकून ४० जण लाचेच्या आरोपाखाली निलंबित झालेले आहेत. मात्र, निलंबित होऊनही हे पोलीस मजाच मारताना दिसत आहेत. कारण आठवड्यातून एक, दोन वेळा पोलीस आयुक्तालयात यायचे, हजेरी रजिस्टरला आठवडाभराच्या सह्या मारायच्या आणि घरी निघून जायचे, असा या निलंबितांचा दिनक्रम सुरू आहे. काहीच न करता दरमहा या निलंबितांना ७५ टक्के वेतन मिळत आहे. नियमाला बगलनिलंबित करण्यात आलेल्या सरकारी नोकराला निलंबनाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५० टक्के वेतन द्यावे आणि तीन महिन्यांनंतर ७५ टक्के वेतन द्यावे, त्यानंतर या निलंबिताला फुकट पोसण्याऐवजी सेवेत रुजू करून घ्यावे आणि ‘साईड पोस्टिंग’ द्यावी, असा एक नियम आहे. पोलीस खात्यात निलंबनाचा कालावधी सरासरी सहा महिने असतो. जास्तीत जास्त तो नऊ महिने करता येतो; परंतु त्यासाठी महासंचालकांची परवानगी घ्यावी लागते. औरंगाबाद आयुक्तालयात निलंबित असलेल्या चाळीसच्या चाळीस पोलिसांच्या निलंबनाचा कालावधी उलटून गेलेला आहे. काही जणांना तर निलंबित करून पावणेचार वर्षे होत आलेले आहे. अद्यापही त्यांना रुजू करू घेण्यात आलेले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर गृह विभागाने या निलंबित कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे आदेश आयुक्तालयाला दिले होते, तरीही त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर १९८७ रोजी दिलेल्या अशाच एका प्रकरणात निकाल दिला होता. त्यात निलंबित पोलिसाला नियमबाह्यरीत्या कालावधीपेक्षा जास्त काळ निलंबित ठेवल्यामुळे निलंबनाच्या कालावधीतील संपूर्ण वेतन त्याला आदा करण्याचे आदेश न्यायालयाने गृहविभागाला दिले होते.