शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आयुक्तालयातील अनेक पोलीस लाटत आहेत फुकटचा पगार!

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : कोणत्याही आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला सहा महिन्यांनंतर रुजू करून घ्यावे, असा एक नियम आहे;

औरंगाबाद : कोणत्याही आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला सहा महिन्यांनंतर रुजू करून घ्यावे, असा एक नियम आहे; परंतु औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात ४० पोलीस अधिकारी, कर्मचारी असे आहे की, ज्यांचे तीन- चार वर्षे उलटून गेले, तर अद्याप त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही. हे ४० जण आयुक्तालयात येतात, सही मारतात अन् घरी निघून जातात. फक्त सही मारण्यासाठी त्यांना ७५ टक्के पगार देऊन पोसण्याचे काम पोलीस आयुक्तालयाकडून सुरू आहे. आजघडीला औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील फौजदार ते निरीक्षक दर्जाचे पाच अधिकारी आणि ३५ कर्मचारी, असे एकून ४० जण लाचेच्या आरोपाखाली निलंबित झालेले आहेत. मात्र, निलंबित होऊनही हे पोलीस मजाच मारताना दिसत आहेत. कारण आठवड्यातून एक, दोन वेळा पोलीस आयुक्तालयात यायचे, हजेरी रजिस्टरला आठवडाभराच्या सह्या मारायच्या आणि घरी निघून जायचे, असा या निलंबितांचा दिनक्रम सुरू आहे. काहीच न करता दरमहा या निलंबितांना ७५ टक्के वेतन मिळत आहे. नियमाला बगलनिलंबित करण्यात आलेल्या सरकारी नोकराला निलंबनाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ५० टक्के वेतन द्यावे आणि तीन महिन्यांनंतर ७५ टक्के वेतन द्यावे, त्यानंतर या निलंबिताला फुकट पोसण्याऐवजी सेवेत रुजू करून घ्यावे आणि ‘साईड पोस्टिंग’ द्यावी, असा एक नियम आहे. पोलीस खात्यात निलंबनाचा कालावधी सरासरी सहा महिने असतो. जास्तीत जास्त तो नऊ महिने करता येतो; परंतु त्यासाठी महासंचालकांची परवानगी घ्यावी लागते. औरंगाबाद आयुक्तालयात निलंबित असलेल्या चाळीसच्या चाळीस पोलिसांच्या निलंबनाचा कालावधी उलटून गेलेला आहे. काही जणांना तर निलंबित करून पावणेचार वर्षे होत आलेले आहे. अद्यापही त्यांना रुजू करू घेण्यात आलेले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर गृह विभागाने या निलंबित कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे आदेश आयुक्तालयाला दिले होते, तरीही त्यांना रुजू करून घेण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर १९८७ रोजी दिलेल्या अशाच एका प्रकरणात निकाल दिला होता. त्यात निलंबित पोलिसाला नियमबाह्यरीत्या कालावधीपेक्षा जास्त काळ निलंबित ठेवल्यामुळे निलंबनाच्या कालावधीतील संपूर्ण वेतन त्याला आदा करण्याचे आदेश न्यायालयाने गृहविभागाला दिले होते.