शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

पाऊसच नसल्याने धावताहेत २१७ टँकर

By admin | Updated: July 15, 2014 00:50 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड पावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने पाणी टंचाईची झळ जिल्हयातील बहुतांश गावांना आता जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असल्याचे अहवालावरून पहावयास मिळत आहे.

व्यंकटेश वैष्णव, बीडपावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने पाणी टंचाईची झळ जिल्हयातील बहुतांश गावांना आता जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असल्याचे अहवालावरून पहावयास मिळत आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी बीड जिल्ह्यात सरासरी ३.२० मि. मि. एवढाच पाऊस झाला आहे. जिल्हयातील वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव वगळता सर्व तालुक्यांमधून आता पाणी टंचाईची ओरड होऊ लागली आहे. आज स्थितीत जिल्ह्यात २१७ टँकर सुरू आहेत. यामध्ये १८ शासकीय तर १९९ खाजगी टँकरची संख्या आहे. यामध्ये १८१ गावे तर २९० वाड्यांचा पाणी टंचाई मध्ये समावेश आहे. बीड जिल्हयातील वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव या गावांमध्ये अद्याप पर्यंत तरी पाणी टंचाई निर्माण झालेली नसून परळी तालुक्यात केवळ एकच टँकर सुरू आहे. धारूर तालुक्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची स्थिती काही प्रमाणात चांगली असली तरी देखील धारूर शहरात मात्र पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. यामुळे येथील नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. धनेगाव धरण कोरडे पडले असल्याने धारूरची पाणी टंचाई तीव्र झालेली आहे. धनेगाव धरण कोरडे पडल्याने धारूरला आता जवळच्याच तांदळवाडी पकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. धारूर नगर परिषदेने नुकतेच २७ लाख रूपये खर्च करून ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत केली आहे. जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात देखील पाण्याची टंचाई मागील दोन वर्षापासून निर्माण झालेली आहे. आज स्थितीत तालुक्यात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये २७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. १२ विहिरी तर १२ बोअर प्रशासनाने अधिग्रहित केले आहेत. एकट्या आष्टी तालुक्यात ९७ टँकर सुरू आहेत. तालुक्यात ८१ गावे तर २१७ वाड्यांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अहवाला वरून लक्षात येते. आष्टी शहराला सध्या ब्रम्हगाव तलावावरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आठ-दहा दिवसातून एकदा नळाला पाणी येते. तर ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी सात विहिरी व १८ बोअर प्रशासनाने अधिग्रहित केले आहेत.अजून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील टँकरची संख्या चारशे ते साडेचारशे पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.साडेतीन लाख नागरिकांना पाणी पुरवठाबीड जिल्हयात मागील तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. आज घडीला जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार ४२६ नागरिकांना जिल्हा प्रशासन टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहे.