शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

...तर देशाचे ऐक्य धोक्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:03 IST

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य, प्रगती, सलोखा आणि स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी ...

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य, प्रगती, सलोखा आणि स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. तसेच कम्युनिस्टांना मोडीत काढायचे या एकाच हेतूने त्यांनी बंगालमध्ये ठाण मांडले. कोरोना संसर्गाच्या काळातही जाहीर सभा घेणे आणि कुंभमेळा भरवण्यास परवानगी देणे, ही घोडचूक असल्याचे ते म्हणाले.

लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी डॉ. मुणगेकर यांचे ‘वर्तमानातील राजकारण’ या विषयावर व्याख्यानाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या संवादमालेच्या सुरुवातीला काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

व्याख्यानाची सुरुवात करताना डॉ. मुणगेकर म्हणाले, अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली. कोरोनाबाबत राहुल गांधींनी फेब्रुवारीमध्येच इशारा दिला होता; पण मोदींनी तेव्हा हा सल्ला ऐकला नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सूचना केल्या. त्या पत्राला उत्तर देण्याचं सौजन्यही मोदींनी दाखवलं नाही. उलट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांची खिल्ली उडवली. कोरोनाची साथ ज्या पद्धतीने हाताळली जात आहे, ती पद्धत अतिशय भयंकर आहे, अशी टीकाही डॉ. मुणगेकर यांनी केली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप केल्याचा हवालाही त्यांनी दिला, तर न्यायव्यवस्था कोसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्यादिवशी उडेल, तेव्हा अराजकता माजेल, अशी भीती व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसंवादचे अध्यक्ष डाॅ. राजेश करपे यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले.