शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

... तर परवाना होणार निलंबित

By admin | Updated: June 20, 2016 00:59 IST

औरंगाबाद : खरीप हंगामात खते आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने दहा भरारी पथके स्थापन केली आहेत.

औरंगाबाद : खरीप हंगामात खते आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने दहा भरारी पथके स्थापन केली आहेत. सध्या या पथकांमार्फत जिल्हाभरात तपासणी सुरू आहे. जादा दराने विक्री केल्याचे आढळल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दुकानदाराचा विक्री परवाना निलंबित केला जाणार आहे. गरज भासल्यास फौजदारी कारवाईच्या सूचनाही या पथकाला देण्यात आल्या आहेत. गुणवत्तापूर्ण व माफक दरात बी-बियाणे, खते, औषधी देऊन मदतीचा हात देता येईल, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक आणि आर्थिक लूट थांबविण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हा स्तरावर एक, अशी एकूण दहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने काढणे, अप्रमाणित नमुन्यांवर कायदेशीर कार्यवाही करणे, कायदेशीर बाबींचे उल्लंघन, संशयित निविष्ठा, बोगस अप्रमाणित निविष्ठा विक्री बंद आदेश देणे, जप्ती करणे ही कामे या पथकांमार्फत केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कीटनाशके, खते आणि बियाणांचे साडेतीनशेहून अधिक नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी आणि तालुकास्तरावर पंचायत समितीत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.