शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

...तर आॅक्सिजन सोबत घेऊन फिरावे लागेल

By admin | Updated: June 5, 2016 23:51 IST

औरंगाबाद : माणसाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे.

औरंगाबाद : माणसाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. कदाचित आपण आजच झाडे लावली नाही तर पुढच्या पिढ्यांना आॅक्सिजनच्या बाटल्या विकत घेऊन त्या गळ्यात घालून फिरण्याची वेळ येईल, अशी भीती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागातर्फे आयोजित ‘लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, वन विभागाचे उपवनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुंजे यांची उपस्थिती होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास शहरातील विविध पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्व्हायर्मेंट रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. दिलीप यार्दी, सृष्टी संवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक, वुई फॉर इन्व्हायर्मेंटच्या मेघना बडजाते, मराठवाडा इन्व्हायर्मेंट केअर क्लस्टरचे बी. एस. खोसे, प्रयास युथ फाऊंडेशनचे अभिषेक पगारे, निसर्ग संवर्धन मंडळाचे राजेंद्र धोंगडे यांनी सादरीकरणाद्वारे त्यांच्या कार्याची माहिती दिली. यंदा १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी झाडे लावायची आहेत. ही झाडे केवळ लावायची नसून ती पुढे जगवायचीही आहेत. लोकसहभागाशिवाय एवढी झाडे जगविणे शक्य नाही, असे सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण म्हणाले.