शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

...तर आॅक्सिजन सोबत घेऊन फिरावे लागेल

By admin | Updated: June 5, 2016 23:51 IST

औरंगाबाद : माणसाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे.

औरंगाबाद : माणसाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. कदाचित आपण आजच झाडे लावली नाही तर पुढच्या पिढ्यांना आॅक्सिजनच्या बाटल्या विकत घेऊन त्या गळ्यात घालून फिरण्याची वेळ येईल, अशी भीती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागातर्फे आयोजित ‘लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, वन विभागाचे उपवनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुंजे यांची उपस्थिती होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास शहरातील विविध पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्व्हायर्मेंट रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. दिलीप यार्दी, सृष्टी संवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक, वुई फॉर इन्व्हायर्मेंटच्या मेघना बडजाते, मराठवाडा इन्व्हायर्मेंट केअर क्लस्टरचे बी. एस. खोसे, प्रयास युथ फाऊंडेशनचे अभिषेक पगारे, निसर्ग संवर्धन मंडळाचे राजेंद्र धोंगडे यांनी सादरीकरणाद्वारे त्यांच्या कार्याची माहिती दिली. यंदा १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी झाडे लावायची आहेत. ही झाडे केवळ लावायची नसून ती पुढे जगवायचीही आहेत. लोकसहभागाशिवाय एवढी झाडे जगविणे शक्य नाही, असे सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण म्हणाले.