शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

...तर नारेगावचा कचरा तसाच सडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:06 IST

मनपाने कचरा टाकण्यासाठी दुसरीकडे जागा शोधली तर नारेगाव डेपोतील कचरा विनाप्रक्रिया तसाच सडण्याची शक्यता आहे. त्या कच-यावर बायो मायनिंग करण्याचा खर्च पालिका करणारच नाही. त्यामुळे नारेगाव येथील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देबायो मायनिंगकडे होईल दुर्लक्ष : २० लाख मेट्रिक टन कचरा डेपोत विनाप्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनपाने कचरा टाकण्यासाठी दुसरीकडे जागा शोधली तर नारेगाव डेपोतील कचरा विनाप्रक्रिया तसाच सडण्याची शक्यता आहे. त्या कच-यावर बायो मायनिंग करण्याचा खर्च पालिका करणारच नाही. त्यामुळे नारेगाव येथील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.नारेगाव-मांडकीतील डेपोमध्ये २० लाख मेट्रिक टन म्हणजे १० लाख क्युबिक मीटर कचरा सध्या विनाप्रक्रिया पडून आहे. त्यामुळे त्या कचºयाच्या दुर्गंधीमुळे १४ गावे प्रदूषणाच्या विळख्यात आली आहेत. ३२ वर्षांपासून तेथे कचरा टाकला जातो आहे. ५ लाख क्युबिक मीटर म्हणजेच १० लाख मेट्रिक टन कच-यावर बायो मायनिंग प्रक्रिया करण्यात येईल, असे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.विभागीय आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, मनपाने दुसरी जागा शोधली तर नारेगावातील कचरा तसाच राहील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यास त्यांना शासनाने नेमलेल्या समितीमार्फत दाद मागता येईल. सध्या पडून असलेल्या कचºयावर मनपाकडून प्रक्रिया करून घेता येईल. शिवाय नारेगाव व परिसरातील आंदोलकांचा समितीमध्ये समावेश केला जाईल. प्रत्येक बैठकीला ते असतील, त्यामुळे त्यांच्यासमक्ष सर्व काही होईल.बायो मायनिंगचा कुठे-कुठे प्रयोग करण्यात आला आहे, त्यावर आयुक्त मुगळीकर म्हणाले, जबलपूर व इतर ठिकाणी प्रयोग यशस्वी झाला आहे. ४८ कोटींचा डीपीआर यासाठी केला आहे. १५० दिवस निविदा प्रक्रियेसाठी लागतील. त्यात बायो मायनिंगचे टेंडर वेगळे असेल. कचºयाचे वर्गीकरण करावे लागेल. प्लास्टिक व इतर कचरा वेगळा करावा लागेल. त्या डेपोमध्ये विंडो करून चर खोदावे लागतील.लोकप्रतिनिधी, प्रशासन हतबलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट, आ.इम्तियाज जलील, आ.अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाचे पदाधिकारी १५ दिवसांपासून हतबल आहेत. तर विभागीय, जिल्हा, पालिका, पोलीस प्रशासनही लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे काहीही निर्णय घेत नसल्यामुळे पूर्ण शहराची कचराकोंडी झाली आहे.विरोध करणा-यांवर गुन्हे दाखल करूजेथे विरोध होईल, तेथील विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातील. नारेगाव वगळून मनपा हद्दीतील जागांवर जेथे विरोध होतो आहे तेथे पोलीस बळाचा वापर केला जाईल. विरोध करणाºया नगरसेवक व नातेवाईकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. कांचनवाडीत ४० एकर मनपाची जागा आहे. तेथे कचरा टाकण्यास शनिवारी विरोध झाला. मनपाच्या चार वाहनांवर दगडफेक झाली, असे आयुक्त मुगळीकर म्हणाले.